शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

पावसाळ्या आधीच परशुराम घाट 'सुसाट'!, १० मे पर्यंत घाटातील वाहतूक बंद राहणार

By संदीप बांद्रे | Updated: April 27, 2023 13:32 IST

जुना घाट रस्ता भरवाने बुजविण्यास सुरवात, कॉक्रिटीकरणालाही येणार वेग 

चिपळूण : मुंबई गोवा महामार्गावरील बहुचर्चित परशुराम घाट दिवसातील पाच तास बंद ठेवल्याने चौपदरीकरणाच्या कामाला प्रचंड वेग आला आहे. या घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून बुजवण्याचे काम सुरू झाले आहे. येत्या आठ दिवसात घाटातील अतिशय धोकादायक ठरलेल्या ठिकाणी सपाटीकरणाचे काम पुर्ण करून तातडीने कॉक्रिटीकरणाच्या कामालाही सुरवात केली जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या आधी घाटातील काम पूर्ण करून दोन्ही लेनवर वाहने सुसाट जाण्याची शक्यता आहे.परशुराम घाटातील धोकादायक स्थितीत असलेल्या ५०० मिटर अंतरातील डोंगर कटाई व सरंक्षण भितीस भराव करण्यासाठी २५ एप्रिल ते १० मे दरम्यान घाटातील वाहतूक दुपारी १२ ते सायंकाळी ५ दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यानुसार मंगळवारपासून घाट बंद ठेवून कल्याण टोलवेज कंपनीने अतिशय धोकादायक असलेल्या ठिकाणी कामाला सुरवात केली आहे. त्यासाठी घाटातील जुन्या रस्त्यावर भराव टाकून दुसऱ्या मार्गाने वाहतूक सुरू ठेवण्याचे नियोजन केले आहे. त्याप्रमाणे मंगळवारी पोलिस बंदोबस्तात घाट बंद ठेवून काम सुरू केले आहे.घाटाच्या मध्यवर्ती भागात कडक कातळ लागल्याने तो तोडताना अनेक अडचणी येत आहेत. दोन ब्रेकर मशिनने हे कातळ तोडण्याचे काम सुरू केले आहे. परंतू तो खडक अतिशय कठिण असल्याने या कामात अडचणी येत आहेत. त्यासाठी बाजूचा नरम कातळ फोडून ताप्तुरत्या स्थितीत पर्यायी रस्ता काढला जात आहे. कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावण्याची आवश्यकता आहे. परंतू घाट माथ्यावर वस्ती असल्याने त्याला अद्याप जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्यता मिळालेली नाही. त्यामुळे ब्रेकरने कातळ फोडण्याचे काम सुरूच ठेवले आहे.

चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वाहतूकपरशुराम घाटातील वाहतूक पाच तास बंद असल्याने या मार्गावरील वाहने चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे वळविण्यात येत आहेत. त्यासाठी कळंबस्ते व परशुराम घाटात पोलिस छावणी उभारण्यात आली आहे. काही अवजड वाहने परशुराम घाटाच्या पायथ्याशीच उभी करून ठेवली जात आहेत. या वाहनांची लांबच लांब रांग लागली आहे. सायंकाळी ५ वाजता घाट खुला होताच ही वाहने सोडली जाणार आहेत. 

आपत्कालीन परिस्थितीत सुचवलेल्या उपाययोजना नाहीतपरशुराम घाट बंदच्या पार्श्वभुमीवर दोन्ही बाजूला फलक उभारण्यात आले आहेत. परंतू त्या व्यतिरीक्त आपत्कालीन परिस्थितीत सुचवलेल्या उपाययोजना ठेकेदार कंपनीकडून केलेल्या दिसत नाहीत. दरडग्रस्त भागात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तेथे जेसीबी, क्रेन, पोकलेन, अॅम्ब्युलन्स, रस्सी, टॉर्च, अग्नीशामक वाहन, इत्यादी आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करावी. जबाबदार अधिकाऱ्यासह पुरेसे मनुष्यबळ मदत व बचाव कार्यासाठी उपलब्ध ठेवण्यात यावे. रस्त्याच्या बाजुस रिफ्लेक्टर लावण्यात यावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत. परंतू अद्यापही या सूचनांचे पालन होताना दिसत नाही.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhighwayमहामार्गTrafficवाहतूक कोंडी