शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
2
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
3
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर
4
मृतांचे क्लेम सेटलमेंट लवकर पूर्ण करणार; अहमदाबाद विमान अपघाताबाबत LIC चा मोठा निर्णय
5
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
6
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
7
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
8
कामाची बातमी! जितके किमी प्रवास, आता तितकाच भरा Toll; कसं काम करणार नवीन टोल पॉलिसी?
9
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
10
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
11
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट', काय आहे याचा अर्थ?
12
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
13
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
14
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
15
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
16
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
17
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
18
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
19
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
20
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;

रत्नागिरी जिल्ह्यात पारंपरिक कात उद्योगाला आर्थिक मंदीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 11:33 IST

पारंपरिक कात उद्योगाला सध्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे बॉयलरला शासनाची परवानगी मिळाली असतानाही कात उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड चालू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कात उद्योगाला चांगले दिवस आले असताना जीएसटी व आर्थिक मंदीचा फटका या उद्योगाला बसत आहे. त्यामुळे मिनी बॉयलर व बॉयलर चालवायचे कसे? असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे.

ठळक मुद्देबॉयलरला अनुमती, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड जीएसटी व आर्थिक मंदीचा फटका कात उद्योगाला नागपूर येथील कमिटीकडून बॉयलर व्यावसायिकांना शासनाची मंजुरी

सुभाष कदमचिपळूण : पारंपरिक कात उद्योगाला सध्या आर्थिक मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळे बॉयलरला शासनाची परवानगी मिळाली असतानाही कात उद्योग अडचणीत सापडला आहे. मात्र, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर खैराची तोड चालू आहे.रत्नागिरी जिल्ह्यात कात उद्योगाला चांगले दिवस आले असताना जीएसटी व आर्थिक मंदीचा फटका या उद्योगाला बसत आहे. त्यामुळे मिनी बॉयलर व बॉयलर चालवायचे कसे? असा प्रश्न व्यावसायिकांसमोर आहे.

दरम्यान, नागपूर येथील कमिटीकडून बॉयलर व्यावसायिकांना शासनाची मंजुरी मिळाली आहे. मंजुरी असली तरी व्यावसायिकांवर शासनाने काही अटी व निर्बंध लादलेले आहेत. आता या अटींची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम वन खात्याच्या अधिकाऱ्यांवर आले आहे.कात उद्योग हा रात्रंदिवस सुरु असतो. त्यामुळे प्रदूषणही होत असते. उन्हाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर काताचे लाल पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यामुळे प्रदूषण होते. अनेक गावांच्या नळपाणी योजना या नदीपात्रात असल्याने उन्हाळ्याच्या दिवसात हे पाणी पिणे अवघड होते.

सावर्डे कापशी नदी पात्रावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजनांबाबत संबंधित ग्रामपंचायती सातत्याने पत्रव्यवहार करतात. परंतु, प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याबाबत कोणतीही दखल घेत नाही. त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. शासन स्तरावर व्यावसायिकांचे वर्चस्व असल्यामुळेच सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले जाते.एकूणच खासगी क्षेत्रातील वृक्षतोड करून त्याची वाहतूक केली जाते. त्यामुळे शासनाचा महसूल बुडतो. एखाद्याच्या हव्यासापोटी शासनाच्याच तिजोरीवर डल्ला मारला जातो. वन खात्याने शासनाच्या तिजोरीत भर पडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. व्यावसायिकांना पाठिशी घालताना शासनाचे नुकसान होणार नाही, याचीही खबरदारी घ्यायला हवी.

एकूणच कात उद्योगातून अनेकांना रोजगार मिळत असतो. अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटत असतो. तरीही शासनाच्या निकषाला अधीन राहून हा व्यवसाय केला तर व्यापक प्रमाणावर या व्यवसायाचा फायदाच होईल व शासनाला त्यातून चांगले उत्पन्न मिळेल. सध्या तरी बॉयलरला शासनाची मंजुरी मिळालेली असल्याने कात व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शासनाने कोणते निर्बंध घातले आहेत, याची माहिती व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेली नाही, असे कात व्यापाऱ्यांनी सांगितले.

कात उद्योगासाठी लागणाऱ्या खैराच्या झाडांबरोबर रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर लाकूडतोडही होते. जिल्ह्याबाहेर जाणारा लाकडाचा किटा थांबला पाहिजे. अन्यथा एक दिवस जगणेही अशक्य होईल. लाकूडतोड थांबली नाही तर माणसाला जगण्यासाठी आवश्यक असणारा १५ किलो आॅक्सिजन मिळणार कसा? ७ झाडे मिळून १५ किलो आॅक्सिजन देत असतात. दररोज माणसाला आॅक्सिजनची गरज असते. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाली तर माणसाला भविष्यात वाळवंटात राहिल्याचा भास होईल व आॅक्सिजनही विकत घ्यावा लागेल. वन खात्याने व संबंधित शासकीय खात्यांनी याबाबत गांभीर्याने दखल घ्यायला हवी. 

तानाजी लाखण ,सामाजिक कार्यकर्ते. निवळी

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEconomyअर्थव्यवस्था