शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी आक्रमक, नगरपंचायतीवर व्यापाऱ्यांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2022 17:27 IST

देवरूख नगरपंचायतीने केलेल्या अतिक्रमण कारवाई विरोधात व्यापारी वर्गात संतापाची लाट

देवरूख : देवरूख नगरपंचायतीने काल, बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविली होती. त्याचे पडसाद आज, गुरूवारी उमटले. शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या कारवाईचा निषेध करत जाब विचारण्यासाठी नगर पंचायतवर धडक दिली.नगर पंचायतच्यावतीने अतिक्रम हटाव मोहिम राबविताना चार दिवस आधी माहिती देणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्यानेच व्यापारी वर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. याबाबत जाब विचारून आपली भुमिका स्पष्ट करण्यासाठी शहरातील व्यापाऱ्यांनी एकत्र येत थेट नगर पंचायत वर मोर्चा काढला.अतिक्रमणामुळे बाजारपेठेत वाहतूक कोंडी होते तर मग पार्किंगचा प्रश्न देखील नगर पंचायत प्रशासनाने सोडविणे गरजेचे आहे. मात्र गेल्या काही वर्षा पासून पार्किंगचा प्रश्न देखील तसाच आहे. नागरिकांना सुविधा उपलब्ध नकरताच थेट कारवाईची मोहीम का असा सवाल व्यापाऱ्यांनी यावेळी केला.नगरपंचायत प्रशासना सोबत चर्चा करण्यासाठी व्यापारी वर्गाने धडक दिली होती. मात्र मुख्याधिकारी उपस्थित नसल्याने व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबा सावंत यांनी भ्रमणध्वनी व्दारे त्यांच्याशी संपर्क केला. अतिरिक्त कार्यभार असल्याने मुख्याधिकारी मंगळवारी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे त्यांच्याशी मंगळवारी चर्चा झाल्यानंतरच कारवाई बाबतचा निर्णय घेतला जावा अशी भूमिका देखील व्यापारी वर्गाने मांडली.दरम्यान, काल बुधवारी केलेली कारवाई हि सरसकट करण्यात आली असून यात  काही व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला आहे, असा आरोप व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. आता यावर काय तोडगा निघणार आणि नगर पंचायत कोणती भूमिका घेणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी