शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक भारतीय संतापलाय..."; पंतप्रधान मोदी यांचा CJI गवईंना फोन, हल्ल्याचा केला निषेध
2
अभिनेता विजय देवरकोंडा याच्या कारला अपघात, दुसऱ्या कारने मागून दिली धडक
3
NDA, MGB अन् JSP मध्ये थेट सामना, बाकीचे रेसमध्येही नाहीत! बिहार निवडणुकीच्या घोषणेनंतर, काय म्हणाले प्रशांत किशोर?
4
हनिट्रॅप, शारीरिक संबंध आणि पैशांची मागणी, निवृत्त अधिकाऱ्यांना जाळ्यात अडकवणारी सुंदरी अशी सापडली
5
न्यूझीलंड विरुद्ध तझमिनची विक्रमी सेंच्युरी; स्मृती पडली मागे! दक्षिण आफ्रिकेचा पहिला विजय
6
तुमचा मित्र कुठे आहे? सहज शोधू शकाल, इन्स्टाग्रामने आणलं खास फिचर, मिळेल अशी माहिती
7
सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाचं पुढे काय होणार? गवईंनी घेतला मोठा निर्णय 
8
बाकी सगळं मान्य, पण शस्त्र टाकणार नाही..; हमास कुणाचंच ऐकेना, इजिप्तमध्ये बैठकीत काय होणार?
9
‘मेट्रो  ९ मार्गिका १५ डिसेंबरपर्यंत आणि मेट्रो ४ मार्गिका ३१ डिसेंबर पर्यंत सुरू करा’, परिवहन मंत्र्यांचे आदेश 
10
भारताविरूद्ध 'अतिआगाऊपणा' पाकिस्तानच्या महिला फलंदाजाला पडला महागात, ICCने सुनावली शिक्षा
11
सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील सार्वजनिक विद्यापीठात अध्यापकांच्या भरती प्रक्रियेस मान्यता
12
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
13
वनडेत ५६४ धावा! प्रतिस्पर्धी संघाला ८७ धावांवर All Out करत या संघानं ४७७ धावांनी जिंकली मॅच
14
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
15
ब्रेस्ट सर्जरी केली, ९ महिने खेळापासून दूर राहिली...; आता पाहा कशी दिसते 'ही' टेनिसस्टार!
16
बिहारामधील मागच्या ४ निवडणुकांत दिसलाय असा कल, नितीश कुमार ज्या बाजूला तोच विजेता 
17
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
18
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
19
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
20
महिला वनडे वर्ल्ड कपच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं घडलं; न्यूझीलंडसह सुझीच्या नावे लाजिरवाणा विक्रम

रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

By शोभना कांबळे | Updated: July 3, 2023 19:01 IST

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ...

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिक व परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्याठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्स वर भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिक जिल्ह्यात येतात. सध्या, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे व वादळी वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी घाटामधील धुक्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. तसेच काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये, दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाट माथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्स वर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्याकरिता थांबू नये. तसेच धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आपल्या वाहनाचे फॉग लॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा. अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. धाेकादायक झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

धबधब्यावर जाऊ नयेरत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येत आहेत. तसेच धबधब्यांचा प्रवाहही जास्त प्रमाणांमध्ये आहे. त्यामुळे धबधब्यात उतरणारे लोक वाहून अथवा गंभीर इजा पोहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तेथे जाणे टाळावे.

माेह टाळापावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डोहामध्ये खोलीचा अंदाज येत नाही. अशा ठिकाणी आपण तसेच लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसtourismपर्यटन