शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

रत्नागिरीच्या पोलिस अधीक्षकांचे पर्यटकांना महत्वाचे आवाहन, म्हणाले..

By शोभना कांबळे | Updated: July 3, 2023 19:01 IST

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ...

रत्नागिरी : पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिकांनी तसेच परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांनी आपली व आपल्या परिजणांची काळजी घ्यावी. तसेच कोणत्याही ठिकाणी नियम व शांततेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केले आहे.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या नागरिक व परजिल्ह्यातून येणाऱ्या पर्यटकांना पाेलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेला समुद्र किनारा व त्याठिकाणी असणारी पर्यटन स्थळे, अनेक धबधबे, पाण्याचे डोह, घाट व घाटांमध्ये असणारे अनेक सनसेट पॉईंट्स वर भेट देण्यासाठी अनेक पर्यटक व नागरिक जिल्ह्यात येतात. सध्या, रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचे व वादळी वाऱ्याचे प्रमाण अधिक आहे. परिणामी घाटामधील धुक्याच्या प्रमाणात ही वाढ झाली आहे. तसेच काही दरड प्रवण क्षेत्रांमध्ये, दरड कोसळण्याची शक्यताही जास्त आहे. त्यामुळे दृश्यमानता कमी झालेली आहे. परिणामी वाहनांचे अपघात होण्याची दाट शक्यता आहे, असे पाेलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी म्हटले आहे.घाटांमधून प्रवास करणाऱ्या अथवा निसर्गप्रेमी लोकांनी घाट माथ्यावर, अवजड वळणावर, सनसेट पॉईंट्स वर आपली वाहने उभी करून सेल्फी काढण्याकरिता थांबू नये. तसेच धुक्यामुळे होणारे अपघात टाळण्याकरिता आपल्या वाहनाचे फॉग लॅम्पचा व परावर्तकांचा योग्य वापर करावा. अतिवृष्टीमुळे घाटामधील असणारी जुनी व मोठी झाडे उन्मळून पडण्याचे प्रमाणही जास्त आहे. धाेकादायक झाडाखाली आपली वाहने उभी करु नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे.

धबधब्यावर जाऊ नयेरत्नागिरी जिल्ह्यात असणाऱ्या अनेक धबधब्यांमध्ये छोटे-मोठे दगड वाहून येत आहेत. तसेच धबधब्यांचा प्रवाहही जास्त प्रमाणांमध्ये आहे. त्यामुळे धबधब्यात उतरणारे लोक वाहून अथवा गंभीर इजा पोहाेचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याठिकाणी तेथे जाणे टाळावे.

माेह टाळापावसाच्या पाण्याने तयार झालेल्या डोहामध्ये खोलीचा अंदाज येत नाही. अशा ठिकाणी आपण तसेच लहान मुलांना घेऊन जाणे टाळावे. अतिवृष्टीमुळे समुद्रामध्ये, धरण, पाणलोट क्षेत्र, नदी व नाल्यांमध्ये (पऱ्यांमध्ये) पोहण्याचा व तेथे भेट देण्याचा मोह टाळावा व सुरक्षितता बाळगावी.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliceपोलिसtourismपर्यटन