शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:07 IST

पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार

रत्नागिरी : दोन वर्षे असलेले कोरोना संकट थाेडे दूर झाले असून, नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांतच पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळे, गुहागर, दापोली याठिकाणी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनपासून दोन वर्षे पर्यटनावर निर्बंध होते. दिवाळीची सुट्टी सुरू आहे. भाऊबीज, पाडवा बुधवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाडवा झाल्यानंतर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. कोकणचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असल्याने परजिल्ह्यातील तसेच दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पर्यटकांचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे गर्दीने फुलणार आहेत.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, आरेवारे, पावस अशा ठिकाणी पर्यटक भेट देतात. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक घेतात. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. तर काही पर्यटक मात्र निवासासाठी थांबतात. जिल्ह्यातील दापाेली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटक दाखल हाेऊ लागले आहेत. त्याचबराेबर रत्नागिरी शहरातील भाट्ये, मांडवी किनाऱ्यावरही स्थानिकाबरोबर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

व्यवसायांना मिळणार उभारी

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हिवाळी पर्यटनासाठी विदेशातील पर्यटक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा राजवाडा आदी प्रमुख स्थळांचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. याठिकाणी पर्यटक भेट देतात.

दिवाळीसाठी आधीच आरक्षण

दिवाळीची जोडून सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व्यवस्थेबरोबर खासगी हॉटेल्समधूनही आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. पर्यटन सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा प्राप्त झाला आहे. वॉटर स्पोर्टचे पर्यटकांना आकर्षण असून, समुद्रसफारीचा आनंद लुटला जाणार आहे.

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु, दिवाळीची सुट्टी सुरू झाली असून पाडवा, भाऊबीजेनंतर पर्यटकाची गर्दी वाढणार आहे. निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा एका दिवसात परत फिरणारे पर्यटक अधिक असतात. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. -विनायक राऊत, सचिव, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDiwaliदिवाळी 2022tourismपर्यटन