शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:07 IST

पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार

रत्नागिरी : दोन वर्षे असलेले कोरोना संकट थाेडे दूर झाले असून, नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांतच पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळे, गुहागर, दापोली याठिकाणी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनपासून दोन वर्षे पर्यटनावर निर्बंध होते. दिवाळीची सुट्टी सुरू आहे. भाऊबीज, पाडवा बुधवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाडवा झाल्यानंतर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. कोकणचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असल्याने परजिल्ह्यातील तसेच दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पर्यटकांचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे गर्दीने फुलणार आहेत.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, आरेवारे, पावस अशा ठिकाणी पर्यटक भेट देतात. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक घेतात. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. तर काही पर्यटक मात्र निवासासाठी थांबतात. जिल्ह्यातील दापाेली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटक दाखल हाेऊ लागले आहेत. त्याचबराेबर रत्नागिरी शहरातील भाट्ये, मांडवी किनाऱ्यावरही स्थानिकाबरोबर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

व्यवसायांना मिळणार उभारी

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हिवाळी पर्यटनासाठी विदेशातील पर्यटक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा राजवाडा आदी प्रमुख स्थळांचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. याठिकाणी पर्यटक भेट देतात.

दिवाळीसाठी आधीच आरक्षण

दिवाळीची जोडून सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व्यवस्थेबरोबर खासगी हॉटेल्समधूनही आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. पर्यटन सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा प्राप्त झाला आहे. वॉटर स्पोर्टचे पर्यटकांना आकर्षण असून, समुद्रसफारीचा आनंद लुटला जाणार आहे.

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु, दिवाळीची सुट्टी सुरू झाली असून पाडवा, भाऊबीजेनंतर पर्यटकाची गर्दी वाढणार आहे. निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा एका दिवसात परत फिरणारे पर्यटक अधिक असतात. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. -विनायक राऊत, सचिव, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDiwaliदिवाळी 2022tourismपर्यटन