शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीच्या सुट्टीमुळे पर्यटकांची पाऊले कोकणाकडे, समुद्रकिनारी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2022 13:07 IST

पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार

रत्नागिरी : दोन वर्षे असलेले कोरोना संकट थाेडे दूर झाले असून, नागरिकांच्या मनातील भीतीही कमी झाली आहे. हिवाळा सुरू झाला असून, येत्या काही दिवसांतच पर्यटकांची पाऊले कोकणाकडे वळणार आहेत. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळे, गुहागर, दापोली याठिकाणी समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी झाली असून, ही गर्दी अजून वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनामुळे लॉकडाऊनपासून दोन वर्षे पर्यटनावर निर्बंध होते. दिवाळीची सुट्टी सुरू आहे. भाऊबीज, पाडवा बुधवार, दि. २६ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे पाडवा झाल्यानंतर पर्यटक येण्यास प्रारंभ होणार आहे. कोकणचे सौंदर्य पर्यटकांना खुणावत असल्याने परजिल्ह्यातील तसेच दिल्ली, गुजरात, मध्यप्रदेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पर्यटकांचे लवकरच कोकणात आगमन होणार आहे. पर्यटकांमुळे समुद्रकिनारे गर्दीने फुलणार आहेत.

जिल्ह्यातील गणपतीपुळे, वेळणेश्वर, आरेवारे, पावस अशा ठिकाणी पर्यटक भेट देतात. समुद्र स्नानाचा आनंद पर्यटक घेतात. सांगली, सातारा, कोल्हापूर या लगतच्या जिल्ह्यातील पर्यटक सकाळी येऊन सायंकाळी परतीचा प्रवास करतात. तर काही पर्यटक मात्र निवासासाठी थांबतात. जिल्ह्यातील दापाेली तालुक्यातील मुरूड किनाऱ्यावर पर्यटक दाखल हाेऊ लागले आहेत. त्याचबराेबर रत्नागिरी शहरातील भाट्ये, मांडवी किनाऱ्यावरही स्थानिकाबरोबर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

व्यवसायांना मिळणार उभारी

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. पर्यटकांचे आगमन सुरू होणार असल्याने छोट्या-मोठ्या व्यवसायांना उभारी मिळणार आहे. हिवाळी पर्यटनासाठी विदेशातील पर्यटक वाढण्याची शक्यता आहे. शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान, मत्स्यालय, थिबा राजवाडा आदी प्रमुख स्थळांचे पर्यटकांना खास आकर्षण आहे. याठिकाणी पर्यटक भेट देतात.

दिवाळीसाठी आधीच आरक्षण

दिवाळीची जोडून सुट्टी असल्याने पर्यटकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवास व्यवस्थेबरोबर खासगी हॉटेल्समधूनही आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. पर्यटन सुरू होणार असल्याने व्यावसायिकांना दिलासा प्राप्त झाला आहे. वॉटर स्पोर्टचे पर्यटकांना आकर्षण असून, समुद्रसफारीचा आनंद लुटला जाणार आहे.

पावसाळ्यात पर्यटकांची फारशी गर्दी नसते. परंतु, दिवाळीची सुट्टी सुरू झाली असून पाडवा, भाऊबीजेनंतर पर्यटकाची गर्दी वाढणार आहे. निवासासाठी येणाऱ्या पर्यटकांपेक्षा एका दिवसात परत फिरणारे पर्यटक अधिक असतात. मंदिरात दर्शनासाठी गर्दी होणार आहे, भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले आहे. -विनायक राऊत, सचिव, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDiwaliदिवाळी 2022tourismपर्यटन