शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:46 IST

पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

रत्नागिरी : सध्या ख्रिसमसची सुट्टी पडल्याने पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. विशेषत: समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण असल्याने रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरीतील पर्यटनस्थळे मात्र बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.नाताळची सुट्टी आणि शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्याला पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने स्थानिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस बचत गटांच्या प्रदर्शनालाही पर्यटक हजेरी लावत आहेत.गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, ही पर्यटनस्थळे सोमवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमी व थिबा पॅलेस ही पर्यटनस्थळे सोमवारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती. थिबा पॅलेसच्या आवाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे.त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या पर्यटकांची व सहलीतील मुलांची मोठी निराशा झाली. ही स्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन