शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

गर्दीच्या हंगामात रत्नागिरीतील पर्यटनस्थळे बंद, पर्यटकांचा हिरमोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 12:46 IST

पर्यटनस्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी नाही

रत्नागिरी : सध्या ख्रिसमसची सुट्टी पडल्याने पर्यटकांची पावले कोकणाकडे वळली आहेत. विशेषत: समुद्रकिनाऱ्याचे पर्यटकांना आकर्षण असल्याने रत्नागिरी तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पर्यटकांची गर्दी वाढली आहे. एकीकडे पर्यटकांची संख्या वाढत असतानाच रत्नागिरीतील पर्यटनस्थळे मात्र बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.नाताळची सुट्टी आणि शनिवार, रविवार जोडून आलेली सुट्टी यामुळे पर्यटकांची पावले रत्नागिरीकडे वळली आहेत. कोकणातील समुद्रकिनाऱ्याला पर्यटक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे श्रीक्षेत्र गणपतीपुळेतील गणेश मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांना अनेक तास रांगेत उभे राहावे लागत आहे. पर्यटकांनी गर्दी केल्याने स्थानिक दुकानदारांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या सरस बचत गटांच्या प्रदर्शनालाही पर्यटक हजेरी लावत आहेत.गणपतीपुळे येथील पर्यटनाचा आनंद लुटल्यानंतर पर्यटक रत्नागिरीतील पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी येत आहेत. मात्र, ही पर्यटनस्थळे सोमवारी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमी व थिबा पॅलेस ही पर्यटनस्थळे सोमवारी म्हणून बंद ठेवण्यात आली होती. थिबा पॅलेसच्या आवाराबाहेर तसा फलकही लावण्यात आला आहे.त्यामुळे बाहेर जाऊन आलेल्या पर्यटकांची व सहलीतील मुलांची मोठी निराशा झाली. ही स्थळे सर्व वारी सुरू ठेवावीत, असे आदेश देण्यात आले होते. परंतु, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटनाला त्याचा फटका बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtourismपर्यटन