शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पर्यटन महोत्सवाची रंगत वाढविणार

By admin | Updated: March 25, 2015 00:46 IST

भाट्येतील महोत्सव : विविध स्पर्धा घेण्याची घोषणा

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये बीच येथे दि. २, ३ व ४ मे २०१५ रोजी होणाऱ्या जिल्हा पर्यटन महोत्सवासाठी विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. अशा स्पर्धांमुळे या महोत्सवात अधिक रंगत भरण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या स्पर्धाची तयारी सुरू आहे. विविध स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी दिलेल्या मुदतीत आपल्या प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी केले आहे.यानिमित्ताने कोकणातील कलावंतांना प्रतिनिधीत्त्व करण्याची संधी मिळणार असून तयार केलेले लोगो व घोषवाक्य चित्रकृती, छायाचित्रांसह आपल्या प्रवेशिका १५ एप्रिल पूर्वी पाठवाव्यात. घोषवाक्य व लोगो स्पर्धेसाठी आशय ‘रत्नागिरी पर्यटन महोत्सव २०१५’ असा आहे. घोषवाक्य ६ शब्दांपर्यंत असावे. एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ५ लोगो किंवा ५ घोषवाक्य पाठवावीत. कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. संबंधित लोगो व घोषवाक्य अन्य उपक्रमात वापरण्याचा हक्क आयोजन समितीकडे राहील. लोगोची सॉफ्ट कॉपी ३१ मार्चपर्यंत १३ल्ल.’ङ्मॅङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. घोषवाक्यांची सॉफ्टकॉपी ३१ मार्च २०१५ पर्यंत १३ल्ल.२’ङ्मँल्ल.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मे वर पाठवावी. छायाचित्र स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्ह्यातील लोकजीवन निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेसाठी एका स्पर्धकाने जास्तीत जास्त ए४ आकाराची १० छायाचित्रे पाठवावीत. छायाचित्रावर कुठल्याही प्रकारचे लेखन, नाव, वॉटरमार्क किंवा इतर सजावट नसावी. हार्डकॉपी १५ एप्रिल पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय (महसूल शाखा) किंवा उपविभागीय अधिकारी कार्यालय चिपळूण, दापोली येथे कार्यालयीन वेळेत पाठवावी. सॉफ्टकॉपी १५ एप्रिलपर्यंत १३ल्ल.स्रँङ्म३ङ्म.ूङ्मेस्र@ॅें्र’.ूङ्मेवर पाठवावी. ई-मेलमध्ये स्पर्धकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, छायाचित्राचे ठिकाण हा तपशील नमूद करावा. हार्डकॉपी सोबत छायाचित्र स्वत काढले असल्याचे हमीपत्र द्यावे, स्पर्धेसाठी हार्डकॉपी ग्राह्य धरली जाईल.चित्रकला स्पर्धेचा विषय रत्नागिरी जिल्हयातील लोकजीवन, निसर्ग, पर्यटनस्थळे असा आहे. स्पर्धांमध्ये कोणत्याही वयोगटातील स्पर्धक सहभागी होऊ शकतील. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी 0२३५२ २२३६०२, 0२३५५-२५२०४६, 0२३५८-२८२०३१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे महोत्सवाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन समिती अध्यक्षांनी कळवले आहे. (प्रतिनिधी)