शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देवरूखात आज ग्रामस्थ धडकणार

By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST

शाळा बंदचा निर्णय : संगमेश्वरातील १७० शाळा बंदच्या मार्गावर

देवरूख : राज्य शासनाने २० पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील १७० शाळा या धोरणामुळे बंद पडणार आहेत. या निर्णयाविरोधात २१ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने सोमवारी ग्रामस्थ व पालक देवरूख तहसील कार्यालयासमोेर धडकणार आहेत.नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष बबन बांडागळे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात प्रत्यक्ष विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा दुपारी २ वाजता पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय असा नेण्यात येणार आहे. कोकण विभागाचा विचार करता कोकणातील ठाणे, पालगड, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे डोंगर- दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या वाडीवस्तीवर सर्वच ठिकाणी अजून सार्वजनिक दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. पावसाळ्यात चार महिन्यात असलेली दळणवळण व्यवस्थाही कोलमडून पडते. शाळांच्या अंतराचे मॅपिंग करताना दऱ्याखोऱ्यांचा विचार न करता हवाई अंतराचे मॅपिंग केलेले आहे. प्रत्यक्ष चालत जाणेचे अंतर व हवाई अंतर यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे बांडागळे यांनी म्हटले आहे.इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांचे नजिकच्या शाळेत स्थलांतर केल्यामुळे त्यांची शाळेची उपस्थिती, रोजचा प्रवास, या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्या यातून त्यांच्या मनात शिक्षणाबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती आहे. संगमेश्वर तालुक्यात एकूण असलेल्या ३८० शाळांपैकी १७० शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील सुमारे २५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शाळा बंद करू नयेत म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ या सर्व समितीचे सदस्य पंचायत समिती कार्यालय ते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाने धडकणार आहेत. तरी २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण त्वरित मागे घ्यावे व दऱ्याखोऱ्यातील वस्ती, तांड्यावरील मुलांना वस्तीवर दर्जेदार शिक्षण व्यवस्था करावी, अशी मागणी बांडागळे यांनी शासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)साडेबारा हजार शाळाराज्यात २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. २० पटाच्या आतील सुमारे १२,६०० शाळा असून, त्यामध्ये सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा अतिदुर्गम वाडीवस्ती तांड्यावरच्या आहेत, असे बांडागळे यांनी सांगितले.