शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
3
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
4
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
5
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
6
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
7
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
8
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
9
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
10
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
11
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
12
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
13
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
14
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
15
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
16
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
17
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
18
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
19
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
20
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना

देवरूखात आज ग्रामस्थ धडकणार

By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST

शाळा बंदचा निर्णय : संगमेश्वरातील १७० शाळा बंदच्या मार्गावर

देवरूख : राज्य शासनाने २० पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील १७० शाळा या धोरणामुळे बंद पडणार आहेत. या निर्णयाविरोधात २१ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने सोमवारी ग्रामस्थ व पालक देवरूख तहसील कार्यालयासमोेर धडकणार आहेत.नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष बबन बांडागळे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात प्रत्यक्ष विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा दुपारी २ वाजता पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय असा नेण्यात येणार आहे. कोकण विभागाचा विचार करता कोकणातील ठाणे, पालगड, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे डोंगर- दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या वाडीवस्तीवर सर्वच ठिकाणी अजून सार्वजनिक दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. पावसाळ्यात चार महिन्यात असलेली दळणवळण व्यवस्थाही कोलमडून पडते. शाळांच्या अंतराचे मॅपिंग करताना दऱ्याखोऱ्यांचा विचार न करता हवाई अंतराचे मॅपिंग केलेले आहे. प्रत्यक्ष चालत जाणेचे अंतर व हवाई अंतर यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे बांडागळे यांनी म्हटले आहे.इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांचे नजिकच्या शाळेत स्थलांतर केल्यामुळे त्यांची शाळेची उपस्थिती, रोजचा प्रवास, या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्या यातून त्यांच्या मनात शिक्षणाबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती आहे. संगमेश्वर तालुक्यात एकूण असलेल्या ३८० शाळांपैकी १७० शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील सुमारे २५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शाळा बंद करू नयेत म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ या सर्व समितीचे सदस्य पंचायत समिती कार्यालय ते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाने धडकणार आहेत. तरी २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण त्वरित मागे घ्यावे व दऱ्याखोऱ्यातील वस्ती, तांड्यावरील मुलांना वस्तीवर दर्जेदार शिक्षण व्यवस्था करावी, अशी मागणी बांडागळे यांनी शासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)साडेबारा हजार शाळाराज्यात २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. २० पटाच्या आतील सुमारे १२,६०० शाळा असून, त्यामध्ये सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा अतिदुर्गम वाडीवस्ती तांड्यावरच्या आहेत, असे बांडागळे यांनी सांगितले.