शहरं
Join us  
Trending Stories
1
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
4
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
5
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
6
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
7
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...
8
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
9
दसरा मेळाव्यानंतर नवा वाद! रामदास कदमांचा धक्कादायक दावा, संजय राऊतांचं संतप्त प्रत्युत्तर
10
माणसाचं तारुण्यच 'संकटात', नवीन विषाणुमुळे...; बाबा वेंगाची हादरवून टाकणारी भविष्यवाणी काय?
11
ITR चुकला? घाबरू नका, 'या' तारखेपर्यंत भरा बिलिटेड रिटर्न; पण, इतका दंड आणि व्याज भरावे लागणार
12
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
13
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
14
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
15
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
16
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
17
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
18
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
19
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
20
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!

देवरूखात आज ग्रामस्थ धडकणार

By admin | Updated: March 20, 2016 23:56 IST

शाळा बंदचा निर्णय : संगमेश्वरातील १७० शाळा बंदच्या मार्गावर

देवरूख : राज्य शासनाने २० पटाच्या आतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या या निर्णयामुळे संगमेश्वर तालुक्यातील १७० शाळा या धोरणामुळे बंद पडणार आहेत. या निर्णयाविरोधात २१ रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हजारोंच्या संख्येने सोमवारी ग्रामस्थ व पालक देवरूख तहसील कार्यालयासमोेर धडकणार आहेत.नव्याने स्थापन झालेल्या संघर्ष समितीच्यावतीने अध्यक्ष बबन बांडागळे या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. या मोर्चात प्रत्यक्ष विद्यार्थीही सहभागी होणार आहेत. हा मोर्चा दुपारी २ वाजता पंचायत समिती कार्यालय ते तहसील कार्यालय असा नेण्यात येणार आहे. कोकण विभागाचा विचार करता कोकणातील ठाणे, पालगड, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे डोंगर- दऱ्यांमध्ये वसलेले आहेत. दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेल्या वाडीवस्तीवर सर्वच ठिकाणी अजून सार्वजनिक दळणवळण व्यवस्था उपलब्ध नाही. पावसाळ्यात चार महिन्यात असलेली दळणवळण व्यवस्थाही कोलमडून पडते. शाळांच्या अंतराचे मॅपिंग करताना दऱ्याखोऱ्यांचा विचार न करता हवाई अंतराचे मॅपिंग केलेले आहे. प्रत्यक्ष चालत जाणेचे अंतर व हवाई अंतर यामध्ये प्रचंड तफावत आहे, असे बांडागळे यांनी म्हटले आहे.इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता त्यांचे नजिकच्या शाळेत स्थलांतर केल्यामुळे त्यांची शाळेची उपस्थिती, रोजचा प्रवास, या वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अचानक उद्भवणाऱ्या समस्या यातून त्यांच्या मनात शिक्षणाबाबत अनास्था निर्माण होण्याची भीती आहे. संगमेश्वर तालुक्यात एकूण असलेल्या ३८० शाळांपैकी १७० शाळा बंद होणार आहेत. या शाळांतील सुमारे २५०० विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे या शाळा बंद करू नयेत म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पालक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक-पालक संघ व माता-पालक संघ या सर्व समितीचे सदस्य पंचायत समिती कार्यालय ते तहसीलदार कार्यालय येथे मोर्चाने धडकणार आहेत. तरी २० पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचे धोरण त्वरित मागे घ्यावे व दऱ्याखोऱ्यातील वस्ती, तांड्यावरील मुलांना वस्तीवर दर्जेदार शिक्षण व्यवस्था करावी, अशी मागणी बांडागळे यांनी शासनाकडे केली आहे. (प्रतिनिधी)साडेबारा हजार शाळाराज्यात २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याबाबत शासन विचाराधीन आहे. २० पटाच्या आतील सुमारे १२,६०० शाळा असून, त्यामध्ये सुमारे १ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या सर्व शाळा अतिदुर्गम वाडीवस्ती तांड्यावरच्या आहेत, असे बांडागळे यांनी सांगितले.