शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

टायर रिमोल्डिंग कारखाना बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:28 IST

देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ...

देवरुख : प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आदेशानुसार कोसुंब शाळेजवळ अनधिकृतपणे सुरू असलेला टायर रिमोल्डिंग कारखाना बंद करण्यात आला आहे. मागील ६ वर्षांपासूनची मागणी मंडळासह अन्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पूर्ण केल्याबद्दल कोसुंब ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

बाजारात ग्राहकांची लूटमार

राजापूर : राजापुरात भरणाऱ्या आठवडा बाजारात येणाऱ्या बाहेरील व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूटमार सुरू आहे. वाढीव दराने मालाची विक्री केली जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. तसेच फळांवर केमिकल्सचा वापर करून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार आठवडा बाजारात सुरू असूनही पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे.

आरोग्य विभागातर्फे विशेष सभा

देवरुख : शिमगोत्सव, कोरोनाअंतर्गत कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह जनजागृतीसाठी संगमेश्वर तालुका आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय तपासणीची मोहीम २४ मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. ग्राम कृती दले पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत.

३३ घरटी संरक्षित

दापोली : मुरूड समुद्रकिनारी कासवाच्या पिलांचे नुकतेच जलार्पण करण्यात आले. आतापर्यंत सुमारे ५५ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. दरवर्षी मुरुडमध्ये ऑलिव्ह रिडले कासवाची अंडी सापडतात. येथील कासवमित्र ज्ञानेश्वर माने व सहकारी राजेश शिगवण यांनी कासवाची ३३ घरटी संरक्षित केली आहेत.

स्पेशल गाड्यांना मुदतवाढ

खेड : शिमगोत्सवात कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्यांना उसळणारी गर्दी लक्षात घेऊन, चार फेस्टिव्हल सुपरफास्ट स्पेशल गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार दोन फेस्टिव्हल स्पेशल ३१ मार्चपासून व अन्य २ स्पेशल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून धावणार आहेत.

रस्त्याच्या कामात घोटाळा

रत्नागिरी : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा-देवरुख-संगमेश्वर या रस्त्याच्या कामात घोटाळा झाला आहे. त्याची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदारावर कडक कारवाई करण्याची मागणी माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी राज्य सरकार आणि विरोधी पक्षाकडे केली आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून कौतुक

मंडणगड : प्रशासनाच्या मदतीने अतिशय उत्तम, सांघिक कार्य करत अत्यंत लोकोपयोगी काम कुंबळे ग्रामीण बाजार व कुंबळे ग्रामपंचायतीने नवीन कार्यालयाच्या रूपाने साकारले आहे. हे काम लोकोपयोगी असल्याने दोन्ही उपक्रमांचे रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी कौतुक केले आहे.

लोकवर्गणीचा प्रश्न निकाली

राजापूर : कशेळी फोडकरवाडी नळपाणी योजनेचा प्रश्न अखेर निकाली काढण्यात आला आहे. नागरिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे लोकवर्गणी देण्याचा निर्णय देण्यात आला आहेे. कशेळी ग्रामपंचायत हद्दीतील फोडकरवाडी येथे १४ वर्षांपूर्वी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली होती. ही योजना १७ लाख रुपयांची होती.

शवविच्छेदन कक्ष बंदच

रत्नागिरी : देवरुख ग्रामीण रुग्णालयामध्ये येणाऱ्या एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाल्यास किंवा एखाद्या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे शवविच्छेदन करण्यासाठी देवरुखमधून १८ किलाेमीटर संगमेश्वरला जावे लागते. ही होणारी परवड थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.