शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

जोरदार पावसाने रत्नागिरी जिल्ह्यातील निम्मी धरणे तुडुंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 5:06 PM

पूर्ण भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी, दि. २२ :जिल्ह्यातील पाटबंधारे विभागांच्या अंतर्गत येणाऱ्या ६१ लघू व २ मध्यम अशा एकूण ६३ धरण प्रकल्पांपैकी ३५ धरणांमध्ये शंभर टक्के पाणी साठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणखी १० धरणे येत्या आठवड्यात पूर्ण भरण्याची शक्यता आहे. २० जुलैपर्यंत सर्व धरणांमध्ये ३५९ .०८ दशलक्ष घनमीटर अर्थात ८०.८२ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. पूर्ण भरलेल्या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. पावसाअभावी भात लावणीचे काम रखडले होते. मात्र, गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भात लावणीचे कामही सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सिंचनासाठी साठवण होत असलेल्या धरणांमध्येही साठा कमी होता. मात्र दमदार पाऊस सुरू झाल्यानंतर २० जुलैपर्यंत जिल्ह्यातील ६३ पैकी ३५ धरणे तुडुंब भरली असून, सांडव्यावरून पाणी वाहून जात आहे. रत्नागिरी शहराची पाण्याची मदार असलेल्या शीळ धरणातही शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहात आहे. या वर्षभरात रत्नागिरीच्या सुधारित पाणी पुरवठा योजनेचे काम होणार आहे. त्यामुळे शीळ धरणातील या पाणीसाठ्यातून रत्नागिरी शहरवासीयांना पुरेसे पाणी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. तालुकानिहाय शंभर टक्के भरलेली धरणे याप्रमाणे : मंडणगड ३, दापोली ४, खेड २, गुहागर १, चिपळूण ८, संगमेश्वर ५, रत्नागिरी १, लांजा ८ आणि राजापूर ३ यांचा समावेश आहे.