शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

कंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:37 AM

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.

ठळक मुद्देकंटेनरमधील जगण्याने तिवरेवासीय हैराणपाणी व विजेचा तुटवडा, कुटुंबियांपुढे प्रश्न

संदीप बांद्रे चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेनंतर तेथील दहा कुटुंबियांनी कंटेनरमध्ये संसार थाटले आहेत; मात्र आता आॅक्टोबर हिटमुळे कंटनेरमधील जीवन या कुटुंबियांना नकोसे झाले आहे. वाढत्या उष्म्याबरोबरच पाणी व विजेचा तुटवडा असे प्रश्न या कुटुंबियांपुढे निर्माण झाले असून, नुकतेच याविषयी तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांना एका पत्राद्वारे या कुटुंंबियांनी कळविले आहे.अवघ्या चिपळूणवासियांचे हृदय पिळवटून टाकणारी घटना तिवरे येथे जुलै महिन्यात घडली. या घटनेत एकूण २२ जणांचा बळी गेला. या धक्क्यातून हळूहळू तिवरेवासीय सावरत असताना त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा कायम आहे. एकूण ४५ कुटुंबियांचे पुनर्वसन अलोरे येथील शासकीय जागेत करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबतची प्रक्रिया अजूनही सुरू आहे. तूर्तास येथील १० कुटुंबियांचे पुनर्वसन तिवरे येथेच कंटेनरमध्ये केले आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक व शासनाकडून प्रत्येकी पाच असे एकूण १० कंटेनर उपलब्ध करून दिल्यानंतर प्रत्येक कंटेनरमध्ये एका कुटुंबाची व्यवस्था करण्यात आली आहे.उघड्या माळरानावर तापताहेत कंटेनरसुरुवातीला धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जागेत कंटेनर ठेवण्यात येणार होते; मात्र तेथे डोंगराला भेगा गेल्याने गावातीलच उघड्या माळरानावर हे दहाही कंटेनर ठेवण्यात आले आहेत. आॅक्टोबर हिटमुळे तापमान वाढले असल्याने त्याची झळ कंटेनरमधील कुटुंबियांना बसू लागली आहे.

दिवसभरात कंटेनर तापत असल्याने आतमध्ये अंगाची लाहीलाही होते. पंखा लावूनही काहीच उपयोग होत नाही. त्यातच कंटेनरबाहेर पडावे तर उन्हाचे चटके आणि रात्रीच्या वेळी डासांचा त्रास होत आहे. स्वच्छतागृहाचे सांडपाणी व मलमूत्रही उघड्यावर सोडलेले असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे.एकाच मीटरवर सर्वांना वीज पुरवठायेथील दहाही कंटेनरना एकाच मीटरवरुन वीजपुरवठा करण्यात आला आहे. घरगुती जोडणी पद्धतीने हा वीजपुरवठा केला असल्याने अनेकदा हा पुरवठा अपुरा ठरतो. त्यातच परिसरात पथदीप नसल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य असते. यामुळे रहिवासी हैराण झाले आहेत.झरे आटण्याच्या मार्गावरधरण फुटीमुळे तिवरेतील पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गावातील पाणीयोजना पूर्णत: ठप्प झाली असून, लोकप्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांनी पुरवलेल्या पाण्याच्या टाक्याही आता पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. अशा परिस्थितीत पुनर्वसित कुटुंबियांसाठी झऱ्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत शिल्लक आहे; मात्र तोही आता हळूहळू आटू लागल्याने येत्या काही दिवसात पिण्याच्या पाण्याचा हा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.दोन महिन्यात कोणी फिरकलेच नाहीतगणेशोत्सवाच्या दोन दिवस आधी म्हणजेच ३० आॅगस्ट रोजी घाईघाईत १० कुटुंबियांची कंटेनरमध्ये पर्यायी व्यवस्था करण्यात आली. तेव्हापासून बळीराम चव्हाण, तुकाराम कनावजे, तानाजी चव्हाण, नारायण गायकवाड, कृष्णा कातुरडे, सखाराम तांबट, भगवान धाडवे, राधिका चव्हाण, लक्ष्मी चव्हाण व माधव धाडवे यांचे कुटुंबीय या कंटेनरमध्ये राहात आहेत. त्यानंतर आजतागायत कोणताही प्रशासकीय अधिकारी वा लोकप्रतिनिधी येथे फिरकलेले नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांतर्फे तहसीलदारांना पत्र देण्यात आले आहे; त्यावर अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

 

कंटेनरमधील पर्यायी व्यवस्था ही तात्पुरत्या स्वरूपाची करण्यात आली होती; मात्र आता दोन महिने होऊनही येथेच राहावे लागत आहे. कंटेनरमधील रहिवास गरम्यामुळे नकोसा झाला असून, शासनाने याची वेळीच दखल घ्यावी.- नारायण गायकवाड, ज्येष्ठ ग्रामस्थ, तिवरे

घाईघाईत बसवण्यात आलेल्या कंटेनरची रचना चुकीच्या पद्धतीने झाली असल्याने वाढत्या उष्म्याचा त्रास होत आहे. शिवाय कंटेनरची लेव्हल योग्य पद्धतीची नसल्याने आतमध्ये असलेल्या स्वच्छतागृहातील पाणी तेथेच साचून राहाते.- बळीराम चव्हाण, तिवरे

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी