शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

आधी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवा

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

रफीक मोडक : कोयनेचे अवजल मुंबईला नेल्यास जनआंदोलनाचा इशारा

चिपळूण : कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या हालचाली सुरु आहेत. गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग पाण्याविना तहानलेलाच आहे. असंख्य गावे तहानलेली असताना जर कोयनेचे पाणी मुंबईत नेले जात असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्यावर संपूर्ण जिल्ह्याची गरज भागवण्याची योजना प्रथम शासनाने तयार करणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी मांडले. ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे अशा ठिकाणी असणाऱ्या नद्यांना, कोयनेचे पाणी डिसेंबरपासून पुढे सोडल्यास त्या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी राहून लगतच्या विहिरींतही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे लगतच्या परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल. या प्रकारची योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभर राबवून संपूर्ण जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त केल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असे मोडक यांनी सांगितले.कोयनेच्या वीज प्रकल्पावर महाराष्ट्राच्या जास्तीतजास्त भागाला विद्युत पुरवठा केला जातो. हा प्रकल्प कोकणात आहे. परंतु, त्याच कोकणावर विविध मार्गाने अन्याय होत आहे. कोयनेचे पाणी समुद्राला जाऊन मिळालेले चालते पण ते येथील शेतकरी किंवा छोट्या उद्योगांना, सर्वसामान्यांना वापरु दिले जात नाही ही गोष्ट संतापजनक आहे. या गोष्टीचा शासनाने व लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. भविष्याचा विचार करता रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा घोषित केलेला आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना भविष्यात उद्योगांसाठी पाण्याची कमतरता असताना यावर्षीप्रमाणेच पुढे पावसाचे प्रमाण कमी झाल्यास व त्यामुळे कोयना धरण ८० ते ९० टक्केच भरले तर पुढील पाच वर्षात कोयना धरण ५० टक्के पण प्रतिवर्षी भरणार नाही अशावेळी वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी पुन्हा धरणात सोडण्याच्या योजना आताच तयार करण्याची गरज आहे. भविष्यात कोयनेचे वाया जाणारे पाणी मुंबईला नेण्याची घाई न करता प्रथम त्याचा अभ्यास व चर्चा करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्याप्रमाणे कोयनेचे पाणी नद्यांना उन्हाळ्यात सोडल्यास कोकणातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकेल. त्यामुळे कोयनेचे पाणी मुंबईत नेल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली.संपूर्ण जिल्हा १०० टक्के टॅँकरमुक्त करा.कोकणावर अन्याय होत असल्याचा आरोप.