शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

आधी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवा

By admin | Updated: September 26, 2015 00:21 IST

रफीक मोडक : कोयनेचे अवजल मुंबईला नेल्यास जनआंदोलनाचा इशारा

चिपळूण : कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या हालचाली सुरु आहेत. गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग पाण्याविना तहानलेलाच आहे. असंख्य गावे तहानलेली असताना जर कोयनेचे पाणी मुंबईत नेले जात असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्यावर संपूर्ण जिल्ह्याची गरज भागवण्याची योजना प्रथम शासनाने तयार करणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी मांडले. ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे अशा ठिकाणी असणाऱ्या नद्यांना, कोयनेचे पाणी डिसेंबरपासून पुढे सोडल्यास त्या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी राहून लगतच्या विहिरींतही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे लगतच्या परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल. या प्रकारची योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभर राबवून संपूर्ण जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त केल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असे मोडक यांनी सांगितले.कोयनेच्या वीज प्रकल्पावर महाराष्ट्राच्या जास्तीतजास्त भागाला विद्युत पुरवठा केला जातो. हा प्रकल्प कोकणात आहे. परंतु, त्याच कोकणावर विविध मार्गाने अन्याय होत आहे. कोयनेचे पाणी समुद्राला जाऊन मिळालेले चालते पण ते येथील शेतकरी किंवा छोट्या उद्योगांना, सर्वसामान्यांना वापरु दिले जात नाही ही गोष्ट संतापजनक आहे. या गोष्टीचा शासनाने व लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. भविष्याचा विचार करता रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा घोषित केलेला आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना भविष्यात उद्योगांसाठी पाण्याची कमतरता असताना यावर्षीप्रमाणेच पुढे पावसाचे प्रमाण कमी झाल्यास व त्यामुळे कोयना धरण ८० ते ९० टक्केच भरले तर पुढील पाच वर्षात कोयना धरण ५० टक्के पण प्रतिवर्षी भरणार नाही अशावेळी वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी पुन्हा धरणात सोडण्याच्या योजना आताच तयार करण्याची गरज आहे. भविष्यात कोयनेचे वाया जाणारे पाणी मुंबईला नेण्याची घाई न करता प्रथम त्याचा अभ्यास व चर्चा करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्याप्रमाणे कोयनेचे पाणी नद्यांना उन्हाळ्यात सोडल्यास कोकणातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकेल. त्यामुळे कोयनेचे पाणी मुंबईत नेल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली.संपूर्ण जिल्हा १०० टक्के टॅँकरमुक्त करा.कोकणावर अन्याय होत असल्याचा आरोप.