शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
4
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
5
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
6
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
7
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
8
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
9
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
10
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
11
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
12
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
13
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
14
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
15
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
16
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
17
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
18
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
19
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती
20
Nimrat Kaur : "दहशतवाद्यांनी आर्मी मेजर वडिलांना किडनॅप करुन केली हत्या"; रातोरात बदललं अभिनेत्रीचं आयुष्य

बनावट ई-पासप्रकरणी रत्नागिरीतील तिघांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महामार्गावरील कशेडी घाटातील पोलीस नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. ...

खेड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महामार्गावरील कशेडी घाटातील पोलीस नाक्यावर जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कडक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीदरम्यान मुंबईहून रत्नागिरीत येताना बनावट ई-पासचा वापर करून प्रशासनाची फसवणूक केल्याप्रकरणी रत्नागिरीतील तिघांवर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महम्मद वसीम रफीक लालू (रा. उद्यमनगर, रत्नागिरी), तन्वीर खुदबु काझी (रा. कोकणनगर, रत्नागिरी), अजीम मंगा (रा. उद्यमनगर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. ही घटना ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजण्याच्या सुमाराला घडल्याचे पोलीस कॉन्स्टेबल अविनाश टेमकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

महम्मद लालू व तन्वीर काझी हे एमएच ०४, जीजे ४९९५ या क्रमांकाच्या झायलो गाडीने मुंबईहून रत्नागिरीकडे येत होते. कशेडी घाटातील तपासणी नाक्यावर त्यांची कार थांबवून तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे ई-पासबाबत पोलिसांनी विचारणा केली. हे दाेघे काहीतरी लपवत असल्याचा संशय आला. त्याचबराेबर या ई-पासवरील अक्षरे लहान - माेठी असल्याचे निदर्शनाला आले. त्यांच्याकडील ई-पासबाबत सायबर क्राईम शाखेत खातरजमा करण्यात आली. त्यानंतर हा ई-पास बनावट असल्याचे उघड झाले. यावेळी पाेलिसांनी त्यांना ई-पासबाबत विचारणा केली असता, हा पास अजीम मंगा यांनी बनवून दिल्याचे सांगण्यात आले. पाेलीस अधीक्षक कार्यालयाच्या लाेगाेचा गैरवापर केल्याचे पाेलीस तपासात सिद्ध झाले. त्यानुसार तिघांवर भारतीय दंड विधान कलम ४२०, ४६८, ४७१, २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक नीशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैशाली आडकुर अधिक तपास करत आहेत.