शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 13:15 IST

कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.

ठळक मुद्देराजापूर तालुक्यातील आंगलेबाकाळेत आणखी तीन कातळशिल्पे

राजापूर : कातळशिल्पाचे नंदनवन म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या राजापूर तालुक्यातील आंगले, बाकाळे व रानतळे परिसरात आणखी तीन नवीन कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये दोन ठिकाणी मानवाकृती तर एका ठिकाणी एकशिंगी गेंडा अशा स्वरुपाची शिल्पे आहेत. दरम्यान, कातळशिल्पांचे शोधक धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आंगले येथील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने गावात सापडलेल्या कातळशिल्पांची साफसफाई केली.कोकण पर्यटनाच्या नकाशावर वेगाने झेपावणाऱ्या कातळशिल्प या कलेची दखल घेणाऱ्या राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कातळशिल्पांचे संरक्षण, जतन व संवर्धन करण्याचा निर्णय घेताना चोवीस कोटी निधीची प्रथमच तरतूद केली होती. त्यामुळे कातळशिल्प या कलेचे महत्त्व गडद झाले आहे . कोकण पर्यटनाचा विचार करता कातळशिल्पांमुळे पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले आहेत.कोकणात विविध ठिकाणी मागील काही वर्षात कातळशिल्पे सापडली आहेत. त्यामध्ये राजापूर तालुका आघाडीवर आहे. तालुक्यातील अनेक गावात कातळशिल्पे यापूर्वी सापडली होती. त्याचे शोधन धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांच्या प्रयत्नाने झाले होते. तालुक्याच्या विविध भागात आणखी कातळशिल्पे सापडतील, अशी शक्यता दाट बनल्याने धनंजय मराठे व सुधीर रिसबुड यांनी आपली शोधमोहीम अजूनही चालूच ठेवली आहे.त्यांना तालुक्यातील बाकाळे, आंगले व रानतळे याठिकाणी कातळशिल्पे असल्याची माहिती मिळाली व त्यानंतर त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन खातरजमा केली. त्यावेळी तीनही ठिकाणी प्रत्येकी एकेक कातळशिल्प आढळून आले. त्यामध्ये बाकाळे येथील मंदार परांजपे यांनी दिलेल्या माहितीवरुन तेथे मानावाकृती कातळशिल्प आढळले.रानतळे येथे एकशिंगी गेंडा शिल्प सापडले असून, ते नऊ फूट लांब तर आठ फूट रुंद आहे. आंगले येथील कातळशिल्प हे शशिकांत काकिर्डे यांच्या जागेत असून, ते मानवाकृती चौकोनी स्वरुपाचे आहे. त्याची लांबी व रुंदी ही सतरा फूट असल्याची माहिती धनंजय मराठे यांनी दिली. आंगले शाळेतील शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी या कातळशिल्पांची साफसफाई केली.

कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्वल व्हावेकोकण पर्यटनाच्या माध्यमातून येथील कातळशिल्पांचे जतन करणे, त्यांचे संवर्धन करुन पर्यटनवाढीला प्रोत्साहन मिळावे हा आमचा उद्देश आहे. ही कातळशिल्पे कोकणच्या वैभवात अधिक भर घालण्याचे काम करतील. जगाच्या नकाशावर कातळशिल्पांमुळे कोकणचे नाव उज्ज्वल व्हावे, यासाठी या शिल्पांच्या संवर्धनासाठी आपण कटीबध्द आहोत.धनंजय मराठेकातळशिल्प शोधक, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcultureसांस्कृतिक