शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

भाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2019 16:28 IST

माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ठळक मुद्देभाजपमध्ये मतभेद असले तरी मनभेद नाहीत- रवींद्र चव्हाण यांची स्पष्टोक्तीमाजी जिल्हाध्यक्ष बाळ माने आणि दीपक पटवर्धन यांचे मनोमिलन

रत्नागिरी : भाजपमध्ये कोणतेही गट- तट नाहीत. सारे एकदिलाने अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांना निवडून देण्याकरिता एकजुटीने प्रचारयंत्रणेत सहभागी झाले आहेत. माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांच्यासमवेत सर्वजण अ‍ॅड. पटवर्धन यांना विजयी करण्यासाठी नियोजन करत आहेत. माने अजिबात नाराज नाहीत, भाजपा एक कुटुंब आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असले तरी मनभेद निश्चितच नाहीत. अपक्ष म्हणून अर्ज भरणारे मुकुंद जोशी हेसुद्धा अर्ज मागे घेतील,असा विश्वास माजी राज्यमंत्री व भाजपचे कोकणचे पालक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.रत्नागिरीत शनिवारी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपच्या प्रचार यंत्रणेची बैठक दीर्घ काळ चालली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद झाली. त्यावेळी सोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, प्रा. नाना शिंदे, माजी तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, अ‍ॅड. अविनाश तथा भाऊ शेट्ये, माजी नगराध्यक्ष अशोक मयेकर, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर उपस्थित होते. तसेच शहराध्यक्ष सचिन करमरकर, राजू भाटलेकर, गटनेता समीर तिवरेकर, नगरसेवक राजू तोडणकर, बिपीन शिवलकर, राजश्री शिवलकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, बाळ माने गेली ४० वर्षे भाजपशी जोडलेले आहेत. त्यांचे नेतृत्व केवळ रत्नागिरीपर्यंत मर्यादित नसून राज्यापर्यंत पोहचलेले आहे. त्यांची कोणतीही नाराजी नाही. भाजप एक कुटुंब आहे. कुटुंबात मतभेद असणे हे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. पक्षात आलबेल नाही, असे पत्रकारांना का वाटते? बाळ माने व मी गेली ३५ वर्षे पक्षात काम करत आहोत. प्रत्येक वेळी पक्षाकडून वेगवेगळी जबाबदारी येत असते, प्रत्येक जण ती पार पाडत असतो, बाळ माने नाराज नाहीत, असे आमदार चव्हाण म्हणाले.चर्चेने गैरसमज दूर झाले : बाळ मानेमाजी जिल्हाध्यक्ष बाळ माने म्हणाले की, भाजप ही संघटना कुटुंबासारखी आहे. एकाच घरात भावाभावांमध्येही मतभेद असू शकतात. मात्र, आमच्यात जे काही विषय होते ते चर्चेने दूर झाले आहेत. मला संघटनेतून बाजूला केले असा काही विषय नाही. मी ११ दिवस परदेशात होतो. दीपक पटवर्धन व माझे चांगले संबंध आहेत. नगराध्यक्ष पदासाठी त्याचे नाव घोषित करताना मलाही फोन आला व मी लगेच अनुमोदन दिले, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :BJPभाजपाRatnagiriरत्नागिरी