शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

गेल्या ३० वर्षांत मे महिन्यात मिळेना ‘हापूस’, आर्थिक गणित विस्कटून आंब्याचा ‘रामराम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 12:09 IST

काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक

रत्नागिरी : बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहमध्ये सापडलेल्या आंबा हंगाम बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून अखेरच्या टप्प्यात आली आहेत. काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. मात्र, मे महिन्यात आंबा खायाला न मिळण्याची ही गेल्या ३० वर्षांतील पहिलीच वेळ आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने पालवी मोठ्या प्रमाणात आली. अपेक्षित थंडी न पडल्याने पालवी जून झाली. परंतु, मोहर प्रक्रिया झाली नाही. पहिल्या टप्प्यात १० ते १५ टक्के आंबा होता. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. चाैथ्या टप्प्यात मोहर झाला. महागडी कीटकनाशके फवारूनही ‘थ्रीप्स’ आटोक्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही भागात किरकोळ प्रमाणात आंबा होता तर काही भागात नव्हता. त्यातच उच्चत्तम तापमानामुळे फळगळ, आंबा भाजणे, साक्याचे वाढलेले प्रमाण याचा फटका आंबा बागायतदारांना बसला. थ्रीप्स व तुडतुड्यावर प्रभावी कीटकनाशक बाजारात न आल्यास भविष्यात हा धोका कायम राहण्याची शक्यता आहे.त्यातच ज्या बागायतदारांनी कराराने आंबा कलमे घेतली आहेत, त्यांना तर चांगलाच फटका बसला आहे. कराराचे पैसे देऊन झाले आहेत. मात्र, अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, त्यातच केलेला खर्चही निघालेला नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात आले आहेत. खत व्यवस्थापन, कीटकनाशके, मजुरी, इंधन, रखवाली, साफसफाई, वाहतुकीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. हा खर्च कसा उभा राहणार, याची चिंता बागायतदारांना आहे.आंबा उत्पादनासाठी बँकांकडून कर्ज घेण्यात येते. त्या कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. आता कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एका पेटीसाठीचा खर्चमजुरीसाठी ४००/ ५०० रूपये, वाहतूक ५० ते १००, खोका/पिंजरा १००, इंधन खर्च ५० /१००, कीटकनाशके ३००, रखवाली ५०, साफसफाई ४०, करारासाठी पेटीला ५०० त्यामुळे एकूण १७०० ते १८०० रूपये खर्च.

भेट नाहीचरत्नागिरी दाैऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आंबा बागायतदारांनी प्रयत्न केला. मात्र, ही भेट झालेली नाही.

यावर्षी इतका भयानक अनुभव एवढ्या वर्षात कधी अनुभवला नाही. आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च वाया गेला. आंबाच नसल्यामुळे पदरी काहीच आले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा, पुढील वर्षीच्या हंगामासाठी शेतकरी उभे राहू शकणार नाहीत. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा