शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

गेल्या ३० वर्षांत मे महिन्यात मिळेना ‘हापूस’, आर्थिक गणित विस्कटून आंब्याचा ‘रामराम’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 12:09 IST

काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक

रत्नागिरी : बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहमध्ये सापडलेल्या आंबा हंगाम बागायतदारांची आर्थिक गणिते विस्कटून अखेरच्या टप्प्यात आली आहेत. काही ठिकाणी शेवटच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. मात्र, मे महिन्यात आंबा खायाला न मिळण्याची ही गेल्या ३० वर्षांतील पहिलीच वेळ आहे.यावर्षी पाऊस लांबल्याने पालवी मोठ्या प्रमाणात आली. अपेक्षित थंडी न पडल्याने पालवी जून झाली. परंतु, मोहर प्रक्रिया झाली नाही. पहिल्या टप्प्यात १० ते १५ टक्के आंबा होता. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यात मोहरच आला नाही. चाैथ्या टप्प्यात मोहर झाला. महागडी कीटकनाशके फवारूनही ‘थ्रीप्स’ आटोक्यात आला नाही. त्यामुळे जिल्ह्यात काही भागात किरकोळ प्रमाणात आंबा होता तर काही भागात नव्हता. त्यातच उच्चत्तम तापमानामुळे फळगळ, आंबा भाजणे, साक्याचे वाढलेले प्रमाण याचा फटका आंबा बागायतदारांना बसला. थ्रीप्स व तुडतुड्यावर प्रभावी कीटकनाशक बाजारात न आल्यास भविष्यात हा धोका कायम राहण्याची शक्यता आहे.त्यातच ज्या बागायतदारांनी कराराने आंबा कलमे घेतली आहेत, त्यांना तर चांगलाच फटका बसला आहे. कराराचे पैसे देऊन झाले आहेत. मात्र, अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही, त्यातच केलेला खर्चही निघालेला नसल्याने बागायतदार आर्थिक संकटात आले आहेत. खत व्यवस्थापन, कीटकनाशके, मजुरी, इंधन, रखवाली, साफसफाई, वाहतुकीसाठी केलेला खर्चही वाया गेला आहे. हा खर्च कसा उभा राहणार, याची चिंता बागायतदारांना आहे.आंबा उत्पादनासाठी बँकांकडून कर्ज घेण्यात येते. त्या कर्जाची परतफेड जून अखेरपर्यंत करावी लागते. आता कर्जाची परतफेड कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एका पेटीसाठीचा खर्चमजुरीसाठी ४००/ ५०० रूपये, वाहतूक ५० ते १००, खोका/पिंजरा १००, इंधन खर्च ५० /१००, कीटकनाशके ३००, रखवाली ५०, साफसफाई ४०, करारासाठी पेटीला ५०० त्यामुळे एकूण १७०० ते १८०० रूपये खर्च.

भेट नाहीचरत्नागिरी दाैऱ्यावर आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा आंबा बागायतदारांनी प्रयत्न केला. मात्र, ही भेट झालेली नाही.

यावर्षी इतका भयानक अनुभव एवढ्या वर्षात कधी अनुभवला नाही. आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च वाया गेला. आंबाच नसल्यामुळे पदरी काहीच आले नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत करणे आवश्यक आहे. अन्यथा, पुढील वर्षीच्या हंगामासाठी शेतकरी उभे राहू शकणार नाहीत. - राजन कदम, बागायतदार

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा