शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

घरात न बसता लोकांच्या दारात जाणारे हे सरकार, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

By मनोज मुळ्ये | Updated: November 30, 2023 19:01 IST

अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज

रत्नागिरी : शासन आपल्या दारी या उपक्रमातून युती सरकारने असंख्य लोकांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचवला आहे. हे स्वत:च्या घरात बसून राहणारे सरकार नाही, तर हे योजना घेऊन लोकांच्या दारात जाणारे सरकार आहे, असा शालजोडीतला टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.रत्नागिरीतील कार्यक्रमात शिंदे यांनी अनेकदा उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोलेबाजी केली. आपण सामान्य लोकांचे सामान्य मुख्यमंत्री आहोत आणि हे सामान्य लोकांच्या मनातील सरकार आहे, असे ते म्हणाले. आपल्या दीड वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकालात मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६० कोटी रुपयांची मदत केली आहे. याआधीच्या मुख्यमंत्र्यांच्या अडीच वर्षाच्या काळात फक्त अडीच कोटीच रक्कम लोकांना दिली गेली, असे त्यांनी सांगितले.सध्याचे सरकार गतिमान असल्याने अनेकांना पोटदुखी सुरू झाली आहे. काहींच्या गळ्यातील पट्टाही निघाला आहे. अजूनही काहीजणांना जालीम औषध देण्याची गरज आहे, असेही शिंदे यांनी मिश्किलपणे सांगितले. आपण कोकणी लोकांचा वापर करुन घेणार नाही. ज्यांनी शिवसेनेवर प्रेम केले आहे, त्यांची फसगत न करता, त्यांचा विश्वासघात न करता त्यांच्या हाताला काम देऊ, असा टोलाही त्यांनी यावेळी हाणला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे