शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

अभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:23 IST

टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्रउमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट

रत्नागिरी : टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक लाख २३ हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

नोंदणीकृत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आला आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व्हरची तांत्रिक तपासणी चालू असून, गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टलच बंद ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिध्द करण्यात येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर दि.१५ जुलै २०१८ रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

अभियोग्यता चाचणीनंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी