शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
4
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
5
हुंड्यासाठी जावयाची क्रूरता! जमिनीसाठी पत्नीची केली हत्या, सासऱ्यालाही दिला विजेचा झटका
6
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
7
Navratri 2025: नवरात्र हा शक्ती उपासनेचा काळ, दुर्गा सप्तशती ग्रंथ वाचनाने कोणते लाभ होतात?
8
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
9
ऐकावं ते नवलच! शोधून शोधून थकली पण सापडलाच नाही नवरा; मग स्वत:शीच केलं लग्न अन्...
10
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
11
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
12
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
13
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
14
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
15
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
16
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
17
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
18
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
19
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  

अभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:23 IST

टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्रउमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट

रत्नागिरी : टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक लाख २३ हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

नोंदणीकृत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आला आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व्हरची तांत्रिक तपासणी चालू असून, गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टलच बंद ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिध्द करण्यात येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर दि.१५ जुलै २०१८ रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

अभियोग्यता चाचणीनंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी