शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

अभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 15:23 IST

टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.

ठळक मुद्देअभियोग्यता चाचणीनंतर ते उमेदवार ठरणार अपात्रउमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट

रत्नागिरी : टीईटी परीक्षा अनुत्तीर्ण असताना अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा काही उमेदवारांनी दिली आहे. त्यानंतर टीईटी परीक्षा देऊन, पवित्र पोर्टलवर तशी नोंद करणारे उमेदवार शिक्षक भरतीसाठी अपात्र ठरविले जाणार आहेत.शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शकरित्या राबवण्यासाठी पवित्र पोर्टल कार्यान्वित केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील बारा हजार शिक्षकांच्या पदांसाठी पहिल्या टप्प्यात भरती प्रक्रिया राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी एक लाख २३ हजार उमेदवारांनी पोर्टलवर नोंदणी केली आहे.

नोंदणीकृत उमेदवारांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्यासाठी नवीन सर्व्हर विकसित करण्यात आला आहे. त्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार आहे. या सर्व्हरची तांत्रिक तपासणी चालू असून, गेल्या काही दिवसांपासून पवित्र पोर्टलच बंद ठेवण्यात आले आहे. त्यावर कोणत्याही सूचना प्रसिध्द करण्यात येत नसल्याने उमेदवारांकडून नाराजी व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात भरती प्रक्रिया कधी सुरू होणार असा प्रश्न उमेदवारांकडून उपस्थित होत आहे.शिक्षक भरतीसाठी शासनाने शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) व अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्ती केली आहे. टीईटी उत्तीर्ण नसताना काही उमेदवारांनी अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा दिली आहे. डिसेंबर २०१७ मध्ये अभियोग्यता व बुध्दिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर दि.१५ जुलै २०१८ रोजी टीईटी परीक्षा घेण्यात आली होती.

अभियोग्यता चाचणीनंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर नोंदी केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. मात्र या नोंदी इयत्ता पहिली ते आठवीच्या शिक्षक पदांसाठी ग्राह्य धरण्यात येणार नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी