शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

परदेशात मराठी वाढवली त्यांचे कौतुक केले पाहिजे : नमिता कीर

By मेहरून नाकाडे | Updated: April 16, 2024 15:32 IST

रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली ...

रत्नागिरी : परदेशात साहित्य संमेलन घेणारी कोमसाप पहिलीच संस्था आहे. मॉरिशस येथील पूर्वजांनी मराठी जतन केली. परदेशात मराठी वाढवली त्यासाठी नक्कीच या लोकांचे कौतुक केले पाहिजे, असे प्रतिपादन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर यांनी केले.कोकण मराठी साहित्य परिषद आणि श्री प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा, मराठी साहित्य आणि मराठी संस्कृतीवर आधारित विशेष लोककलांचा कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर बोलत होत्या. यावेळी मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष पुतलाजी, मॉरिशस मराठी स्पिाकिंग युनिअनचे अध्यक्ष नितीन बाप्पू, इंटरनॅशनल कल्चरल अँड सोशल फोरम मॉरिशस दिलीप ठाणेकर, कोमसापचे मुख्य विश्वस्थ रमेश कीर, जयू भाटकर, गजानन पाटील उपस्थित होते.मॉरिशस मराठी कल्चरल सेंट्रल ट्रस्टचे अध्यक्ष अर्जन पुतलाजी यांनी मनोगत व्यक्त करताना, भारतातील हा माझा तिसावा दौरा आहे. मॉरिशसला पूर्वज गुलाम म्हणून गेले. त्यांनी भाषा, संस्कृती टिकवण्याचे काम केले. पुढे जाऊन मराठी भाषा व संस्कृती जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. त्याला जोड म्हणून रत्नागिरीत होत असलेल्या या पहिल्या कार्यक्रमासाठी नमिता कीर यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले.सुत्रसंचालन माधव अंकलगे यांनी केले. उद्घाटन सोहळ्यानंतर माॅरिशसच्या मंडळींनी विविध सांस्कृतिक कलांचे सादरीकरण केले. नृत्यातून गणेशवंदना, श्री विठ्ठल रखुमाई सादर केली. कोळीनृत्याचे ही सुरेख सादरीकरण केले. मराठी भाषेत एकांकिकेचेही सादरीकरण करून रसिकांकडून प्रशंसा मिळविली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी