शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
2
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
3
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
4
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
5
Diwali Sale: ७०००mAh बॅटरी आणि ३ कॅमेरे असलेला फोन ६७९ रुपयांच्या ईएमआयमध्ये उपलब्ध
6
Viral Video: "दात आहेत की वेटलिफ्टिंग मशीन?" तरुणाचा व्हिडीओ पाहून नेटकरी शॉक!
7
२७ महिन्यांपासून पगार नाही, सुट्टी मागितल्यास..., वैतागलेल्या कर्मचाऱ्याने सरकारी ऑफिससमोरच संपवलं जीवन 
8
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
9
सोमवती अमावस्या आणि लक्ष्मी पूजनाचा दुर्मिळ योग; 'या' ७ राशींच्या आयुष्याला मिळणार कलाटणी
10
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
11
Mohammed Shami: शमीनं निवड समितीची केली बोलती बंद, रणजी स्पर्धेत ७ विकेट्स घेऊन दिला फिटनेसचा पुरावा!
12
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
13
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
14
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
15
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
16
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
18
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
19
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
20
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार

गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:44 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देगुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडलीनिकाल लागून दहा दिवस लोटले तरी वितरण नाही

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेला बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला अद्याप प्रारंभ झाला नसल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१ आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी ३,५६०, विज्ञान शाखेसाठी २,४८०, वाणिज्य शाखेसाठी २,०८०, संयुक्तकरिता १८४० मिळून एकूण ९ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात विनाअनुदानित ५१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेसाठी २,९२०, विज्ञान शाखेमध्ये ४,०८०, वाणिज्य ५,२४०, संयुक्त १४०० मिळून एकूण १३ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे.

स्वयंअर्थ सहाय्यितची एकूण २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेमध्ये ८८०, विज्ञान ११२०, वाणिज्य १०४०, संयुक्त ७८०, मिळून एकूण ३,८२० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे तर आहेच शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅफलाईन सुरू करणे आवश्यक होते. जेणेकरून प्रवेश अर्ज, छाननी, निवड यादी आदी कामे सोपी झाली असती. निकालपत्र देण्याबाबत अधिकृत सूचना अद्यान न काढल्याने पालकवर्ग देखील प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी