शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

गुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:44 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.

ठळक मुद्देगुणपत्रिकाच नसल्याने अकरावी रखडलीनिकाल लागून दहा दिवस लोटले तरी वितरण नाही

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा आॅनलाईन निकाल लागून दहा दिवस लोटले तरी विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वितरण करण्यात आलेले नाही. परिणामी अकरावी प्रवेश प्रक्रिया रखडणार आहे. शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत पदविका प्रवेश प्रक्रियेसाठी मुदत संपल्याने मुदतवाढ दिली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातून २३ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ हजार ३१५ परीक्षेला बसले होते. त्यातील २० हजार २८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, एकूण निकाल ८७ टक्के इतका लागला आहे. जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेला अद्याप प्रारंभ झाला नसल्याने यावर्षी प्रवेश प्रक्रिया रेंगाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१ आहे. त्यामध्ये कला शाखेसाठी ३,५६०, विज्ञान शाखेसाठी २,४८०, वाणिज्य शाखेसाठी २,०८०, संयुक्तकरिता १८४० मिळून एकूण ९ हजार ९६० इतकी प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात विनाअनुदानित ५१ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेसाठी २,९२०, विज्ञान शाखेमध्ये ४,०८०, वाणिज्य ५,२४०, संयुक्त १४०० मिळून एकूण १३ हजार ६४० प्रवेश क्षमता आहे.

स्वयंअर्थ सहाय्यितची एकूण २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. कला शाखेमध्ये ८८०, विज्ञान ११२०, वाणिज्य १०४०, संयुक्त ७८०, मिळून एकूण ३,८२० प्रवेश क्षमता आहे. जिल्ह्यात कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. विद्यार्थ्यांचा सर्वाधिक ओढा विज्ञान शाखेकडे तर आहेच शिवाय व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे.अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅफलाईन सुरू करणे आवश्यक होते. जेणेकरून प्रवेश अर्ज, छाननी, निवड यादी आदी कामे सोपी झाली असती. निकालपत्र देण्याबाबत अधिकृत सूचना अद्यान न काढल्याने पालकवर्ग देखील प्रतीक्षेत आहेत.

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकालRatnagiriरत्नागिरी