शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
3
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
4
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
5
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
6
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
7
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
8
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
9
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
10
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
11
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
12
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
13
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
14
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
15
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
16
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
17
'स्वत:चे घर घेणे' सर्वात वाईट निर्णय? 'भाड्याने राहा आणि कोट्यधीश व्हा'; बँकरने सांगितला फॉर्म्युला
18
किडनी फेल झाल्याने सतीश शाह यांचं निधन; 'या' गोष्टी कारणीभूत, 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
19
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
20
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

सीईटी सेलला रत्नागिरीचे वावडे, विद्यार्थ्यांची फरफट; जिल्ह्यात दोनच केंद्र

By मेहरून नाकाडे | Updated: April 3, 2025 17:50 IST

मेहरून नाकाडे रत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी ...

मेहरून नाकाडेरत्नागिरी : बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एमएचटी सीईटी परीक्षा द्यावी लागते. रत्नागिरी जिल्ह्यात दरवर्षी साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेची परीक्षा देतात. मात्र रत्नागिरी हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असताना शहरात एकही परीक्षा केंद्र नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी फरफट तर होते, शिवाय पालकांना आर्थिक भुर्दंडही बसत आहे.एमएचटी सीईटी परीक्षेसाठी अभ्यासक्रम हा बारावी विज्ञान अभ्यासक्रमासारखाच असतो. यात काही बदल नसतो. ही परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून घेतली जाते. अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भाैतिकशास्त्र, रसायनशास्त्र, किंवा गणित या तीन विषयातील दाेन विषयांचा पेपर द्यावा लागतो, तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र, अर्थशास्त्र किंवा जीवशास्त्र या विषयाचा पेपर द्यावा लागतो.

आवश्यक सुविधाऑनलाईन परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे त्यासाठी सुसज्ज अभियांत्रिकी महाविद्यालयाची आवश्यकता आहे. त्यामध्ये २०० ते ३०० संगणक, सर्व संगणक लॅन नेटवर्कमध्ये असणे आवश्यक आहे. त्याशिवाय उत्तम नेटवर्क, वीजप्रवाह खंडित झाल्यास तातडीने बॅकअप सुविधा, सीसीटीव्ही यंत्रणा, वाॅशरूम, परीक्षा घेण्यासाठी मनुष्यबळ या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. रत्नागिरी शहरात या सुविधा उपलब्ध असताना विद्यार्थ्यांना अन्य तालुक्यात जावे लागते, हे दुर्दैव आहे.

जिल्ह्यात दोन केंद्रचरत्नागिरी शहर हे जिल्ह्याचे महत्वपूर्ण ठिकाण आहे. असे असताना व शहरात अभियांत्रिकी महाविद्यालय असतानाही परीक्षा न होता, भरणे (खेड) व गतवर्षीपासून खेर्डी (चिपळूण) येथे परीक्षा घेण्यात येत आहे. मंडणगड ते राजापूरपर्यंत जिल्ह्याचा विस्तार आहे. तेथील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी भरणे किंवा खेर्डी या केंद्रावर परीक्षेसाठी जावे लागत आहे.

दोन तास आधी रिपोर्टिंगपरीक्षेपूर्वी दोन तास आधी रिपोर्टिंग करावे लागते. त्यामुळे सकाळी ९ वाजता पेपर असला तर सात वाजता रिपोर्टिंग द्यावे लागते. परिणामी जिल्हाभरातून परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक तर परीक्षेच्या आदल्या दिवशी वस्तीला जावे लागते. अन्यथा पालकांना खासगी वाहनांसाठी पैसे मोजावे लागतात. एकूणच परीक्षा व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांची फरफट तर होते, पालकांनाही आर्थिक भुर्दंड बसत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षा