शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रत्नागिरी : शीळ धरण परिसरात डोंगर खचताेय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 18:46 IST

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी जाऊ लागले ...

रत्नागिरी : समाधानकारक पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारे शीळ धरण भरुन वाहू लागले आहे. धरणाच्या सांडव्यावरुन पाणी जाऊ लागले लागल्यामुळे नदीपात्राची पातळी वाढलेली आहे. या सांडव्यापासून काही अंतरावर असलेला डोंगराचा भाग यंदाच्या पावसात खाली येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.रत्नागिरी शहराला लागणारे पाणी पुरवठा करण्यासाठी शीळ येथे धरण बांधण्यात आले. पाण्याची वाढती गरज लक्षात घऊन धरणाची साठवण क्षमता वाढविण्यात आली. त्यासाठी शेजारी सांडवा बांधण्यात आला होता. गेल्या महिन्याभरात रत्नागिरीत सरासरी पावसाची नोंद चांगली झाली आहे. त्यात धरणक्षेत्रांमध्ये पाऊस समाधानकारक आहे. त्याचा फायदा शीळ धरणातील पाणी साठा वाढीला झाला आहे. आठ दिवसांपुर्वीच धरणातील सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे.यंदा रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मे महिन्याच्या अखेरीस एक दिवसाआड पाणी सुरु ठेवण्यात आले. मॉन्सून लांबल्यामुळे मृत साठा वापरण्याची वेळ आली होती; परंतु ९ जूननंतर अधुनमधून पडणार्‍या सरींनी दिलासा दिला. धरण क्षेत्रातही पाणी वाढू लागले. सध्या धरणात पुरेसा साठा झाला असून, सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.मुसळधार पावसाचा जोर वाढला की सांडव्यापासून काही अंतरावर असलेल्या भागात भूस्खलन होते. गेली पाच वर्षे सातत्याने येथील डोंगरातील दगड, माती कोसळत आहे. धरण भरुन वाहू लागल्यामुळे भविष्यात येथील भाग कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गतवर्षी कोसळलेल्या दरडीपासून काही अंतरावर घरे आहेत. त्या घरांना याचा धोका निर्माण होऊ शकतो. पावसाचा जोर जुलै महिन्यात वाढत असल्याने भूस्खलनाची टांगती तलवार कायम राहणार आहे.प्रस्ताव तयार, निधी?शीळ धरणाच्या सांडव्याजवळील झालेल्या भूस्खलनावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी संरक्षक भिंत उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्याला निधी मंजूर झाला की त्यावर कार्यवाही होणार होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी