शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

परतीसाठी चाकरमान्यांची कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांना होतेय गर्दी

By शोभना कांबळे | Updated: September 6, 2022 17:14 IST

रेल्वे गाड्या खचाखच भरून जात आहेत

रत्नागिरी : कोकणचे लाडके दैवत असलेल्या गणपत्ती बाप्पाला जड अंत:करणाने निरोप देऊन चाकरमानी आता पुन्हा आपल्या कामावर हजर होण्यासाठी परतत आहेत. त्यामुळे कोकण मार्गावरील गाड्यांना दिवसरात्र मोठ्या संख्येने गर्दी होत आहे. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच गणेशोत्सव असल्याने यंदाच्या उत्सवाला चाकरमान्यांची अलोट गर्दी होणार, हे लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने यावेळी परिपूर्ण नियोजन केले असून राखीव पोलीस दल तैनात केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गर्दी होऊनही सर्व व्यवस्था सुरळीत सुरू आहे.काेरोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या कालावधीत गणेशोत्सव तणावाखाली साजरा केला जात होता. पहिल्या वर्षी तर सर्वच बंद होते. दुसऱ्या वर्षी गणेशेात्सव निर्बंधाखाली साजरा झाला होता. मात्र, कोरोनाचे संकट टळल्यानंतर विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी आणि त्याच्या स्वागतासाठी भक्त आसुसलेले होते. त्यामुळे यंदा मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गावाला परतणार हे लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने एक महिना आधीच अधिक गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार गणपती सणापुर्वी आठ दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावर ये - जा करणाऱ्या सुमारे २९० गाड्या सोडण्यात आल्या आहेत.पाच दिवसांच्या गणेशाला सोमवारी निरोप दिल्यानंतर चाकमानी पुन्हा आपल्या कामावर जाण्यासाठी परतत आहे. त्यामुळे या मार्गावरच्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. दिवसभर रत्नागिरीचे रेल्वे स्थानक प्रवाशांनी गजबजलेले दिसत आहे. रात्री सुटणाऱ्या गाड्यांना प्रवाशांकडून अधिक पसंती दिली जात आहे.रेल्वेतील मधल्या मोकळ्या जागेतही उभे राहून प्रवासी प्रवास करत आहेत. गाड्या खचाखच भरून जात आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने राखीव पोलीस दलाची कुमक तैनात केली आहे. मुंबई ते सावंतवाडी दरम्यान या गाड्यांमध्ये सुमारे २०० सुरक्षा रक्षक बंदोबस्त ठेवत आहेत. आठवडाभर कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कायम रहाणार आहे.रेल्वेस्थानकावर २४ तास बंदोबस्त तैनातरत्नागिरीतील रेल्वे स्थानकावर होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन पोलीस मुख्यालयातील एक अधिकारी, चार अंमलदार आणि दोन गृहरक्षक दलाचे जवान मंगळवारपासून या रेल्वेस्थानकावर २४ तास तैनात ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीKonkan Railwayकोकण रेल्वेGanesh Mahotsavगणेशोत्सव