शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

खूनप्रकरणातील संशयिताचा जामीन फेटाळला, सहा महिने न्यायालयीन कोठडीतच

By मनोज मुळ्ये | Updated: May 1, 2024 17:05 IST

वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचा जुलै २०२३ मध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी तिचा प्रियकर राजेंद्र गोविंद गुरव याला ऑक्टोबरमध्ये अटक झाली आहे.

लांजा : विवाहितेच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित आरोपी प्रियकराचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथे ही घटना घडली होती. यात वैशाली चंद्रकांत रांबाडे हिचा जुलै २०२३ मध्ये खून झाला होता आणि या प्रकरणी तिचा प्रियकर राजेंद्र गोविंद गुरव याला ऑक्टोबरमध्ये अटक झाली आहे.

लांजा तालुक्यातील कोंड्ये रांबाडेवाडी येथील वैशाली रांबाडे खून प्रकरणाचा उलगडा अडीच महिन्यांनंतर झाला होता. वैशाली चंद्रकांत रांबाडे (४८ वर्षे) ही शनिवार दि. २९ जुलै २०२३ रोजी कुवे येथे डॉक्टरकडे जाते, असे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती घरी न परतल्याने तिचे पती चंद्रकांत रांबाडे हे मुंबईहून गावी आले. त्यानंतर त्यांनी रविवार दि. ३० जुलै रोजी लांजा पोलिस स्थानकात वैशाली बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल केली होती. लांजा पोलिस तिचा शोध घेत होते. बराच काळ शोध न लागल्याने तिच्या पतीने ११ ऑक्टोबर रोजी वाडीतीलच राजेंद्र गुरव याच्यावर संशय घेत लांजा पोलिसांकडे फिर्याद दाखल केली. १२ ऑक्टोबरला पोलिसांनी राजेंद्रला अटक केली आणि या प्रकरणाचा गुंता सुटला.

शनिवार दि. २९ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास वैशालीला कुवे येथील जंगलमय भागात नेऊन राजेंद्रने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात उघड झाले.राजेंद्र गुरव आणि वैशाली रांबाडे यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातून वैशालीने राजेंद्र याच्याकडे वारंवार पैशासाठी तगादा लावला होता. या त्रासाला कंटाळूनच राजेंद्रने वैशाली हिचा काटा काढल्याचे तपासात पुढे आले.

दि. १२ ऑक्टोबर रोजी त्याला लांजा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला ८ दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली होती. याप्रकरणी आतापर्यंत  संशयिय आरोपी राजेंद्र  न्यायालयीन कोठडीत आहे. त्याने जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाल्यात अर्ज केला होता. यावर दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. फिर्यादी चंद्रकांत रांबाडे यांच्यावतीने ॲड. अमित आठवले यांनी न्यायालयात जोरदार बाजू मांडली. न्यायालयाने राजेंद्र गुरव यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी