शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिल्लाच्या मृत्यूचे कारण आले समोर

By मनोज मुळ्ये | Updated: November 18, 2023 13:09 IST

गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले

मनोज मुळ्येरत्नागिरी : चार महिन्यांचे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले, त्यामुळे दुधाअभावी त्याची उपासमार झाली. कळपापासून लांब गेले, त्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिलाचा शवविच्छेदन अहवाल वनखात्याला मिळाला असून, त्यात उपासमार आणि मानसिक ताण हेच कारण नमूद करण्यात आले आहे.देवमाशाच्या पिलाला सुखरूप समुद्रात सोडण्यासाठी शेकडो हात मदतीसाठी पुढे झाले. मात्र, त्यानंतरही त्या पिलाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरुवारी या पिलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून उपासमार आणि मानसिक ताण ही दोन कारणे पुढे आली आहेत. वन खाते, महसूल खाते, मालगुंड आणि गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच कर्मचारी, परगावाहून आलेले पर्यटक आणि असंख्य ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोमवारी सकाळपासून मंगळवारी रात्रीपर्यंत या पिलाला वाचविण्यासाठी आणि खोल समुद्रात पाठविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. मंगळवारी रात्री ते पिल्लू खोल समुद्रात गेलेही. मात्र, बुधवारी ते परत आले. तेही मृतावस्थेत. गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले.

आईचे दूध तीन वर्षेदेवमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिले तीन वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. सगळेच मासे कळपाने राहतात. देवमासाही कळपानेच वावरतो. मात्र, आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले, तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना देवमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.

आई करून देते शिकारदेवमाशाची पिल्ले तीन वर्षांची होईपर्यंत आईचे दूध पितात आणि त्याच वेळी त्यांची आई त्यांना छोट्या माशांची शिकार करून देते. कळपातच या माशांना छोट्या माशांच्या शिकारीचे प्रशिक्षणही मिळते. तीन वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वत:च शिकार करून खातात.

माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले किंवा आपल्या कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या, कळपाबाहेर गेलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अधिक वेगाने हालचाली केल्या जातात. - राजश्री कीर, परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण. 

देवमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनाऱ्यावर आलेले पिल्लूच तीन ते साडेतीन टन वजनाचे हाेते. असे वजनदार मासे पाण्यात स्वत:चे वजन आरामात पेलतात. मात्र, जेव्हा ते किनाऱ्यावर येतात किंवा वाळूत अडकून राहतात, तेव्हा त्यांचे हे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशा वेळी त्यांचे फुप्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते. - प्रा.स्वप्नजा माेहिते, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी