शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिल्लाच्या मृत्यूचे कारण आले समोर

By मनोज मुळ्ये | Updated: November 18, 2023 13:09 IST

गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले

मनोज मुळ्येरत्नागिरी : चार महिन्यांचे पिल्लू आपल्या आईपासून दुरावले, त्यामुळे दुधाअभावी त्याची उपासमार झाली. कळपापासून लांब गेले, त्यामुळे त्याच्यावर मानसिक ताण आला आणि यातूनच त्याचा मृत्यू झाला. गणपतीपुळे समुद्रकिनारी आढळलेल्या देवमाशाच्या पिलाचा शवविच्छेदन अहवाल वनखात्याला मिळाला असून, त्यात उपासमार आणि मानसिक ताण हेच कारण नमूद करण्यात आले आहे.देवमाशाच्या पिलाला सुखरूप समुद्रात सोडण्यासाठी शेकडो हात मदतीसाठी पुढे झाले. मात्र, त्यानंतरही त्या पिलाचा मृत्यू झाल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. गुरुवारी या पिलाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यातून उपासमार आणि मानसिक ताण ही दोन कारणे पुढे आली आहेत. वन खाते, महसूल खाते, मालगुंड आणि गणपतीपुळे ग्रामपंचायत, जीवरक्षक, पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, तसेच कर्मचारी, परगावाहून आलेले पर्यटक आणि असंख्य ग्रामस्थांनी या मोहिमेत सहभाग घेतला.सोमवारी सकाळपासून मंगळवारी रात्रीपर्यंत या पिलाला वाचविण्यासाठी आणि खोल समुद्रात पाठविण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली. मंगळवारी रात्री ते पिल्लू खोल समुद्रात गेलेही. मात्र, बुधवारी ते परत आले. तेही मृतावस्थेत. गुरुवारी त्याचे शवविच्छेदन करून त्याला मालगुंड खाडीकिनारी दफन करण्यात आले.

आईचे दूध तीन वर्षेदेवमासा हा सस्तन मासा आहे. त्याची पिले तीन वर्षांची होईपर्यंत आईच्या दुधावरच जगतात. सगळेच मासे कळपाने राहतात. देवमासाही कळपानेच वावरतो. मात्र, आई आणि तिची पिल्ले कळपापासून थोडे वेगळे असतात. एखादे पिल्लू दगावले, तर त्याची आई शोकही व्यक्त करते. माणसांमध्ये आढळणाऱ्या भावना देवमाशातही मोठ्या प्रमाणात आढळतात.

आई करून देते शिकारदेवमाशाची पिल्ले तीन वर्षांची होईपर्यंत आईचे दूध पितात आणि त्याच वेळी त्यांची आई त्यांना छोट्या माशांची शिकार करून देते. कळपातच या माशांना छोट्या माशांच्या शिकारीचे प्रशिक्षणही मिळते. तीन वर्षांची झाल्यानंतर ही पिल्ले स्वत:च शिकार करून खातात.

माणसांपेक्षा अधिक संवेदनशीलता प्राण्यांमध्ये असते. ते आपल्या कार्यक्षेत्राबाहेर गेले किंवा आपल्या कळपाबाहेर गेले, तर सैरभैर होतात. त्यांच्यावर मानसिक ताण येतो. कधी कधी या मानसिक ताणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटकाही येतो. त्यात ते दगावण्याची भीती असते. त्यामुळे संकटात सापडलेल्या, कळपाबाहेर गेलेल्या प्राण्यांच्या मदतीसाठी अधिक वेगाने हालचाली केल्या जातात. - राजश्री कीर, परिक्षेत्र वनअधिकारी, चिपळूण. 

देवमासा अधिक वजनदार असतो. गणपतीपुळे किनाऱ्यावर आलेले पिल्लूच तीन ते साडेतीन टन वजनाचे हाेते. असे वजनदार मासे पाण्यात स्वत:चे वजन आरामात पेलतात. मात्र, जेव्हा ते किनाऱ्यावर येतात किंवा वाळूत अडकून राहतात, तेव्हा त्यांचे हे वजन त्यांच्याच जिवावर बेतू शकते. अशा वेळी त्यांचे फुप्फुस तुटून अंतर्गत रक्तस्राव होण्याची भीती अधिक असते. - प्रा.स्वप्नजा माेहिते, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी