शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: हरचेरी, असोडे अन् बावनदी धरणातील गाळ उपशाचा प्रस्ताव चार वर्षे पडला खितपत

By अरुण आडिवरेकर | Updated: May 10, 2023 15:55 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला  सुरुवात होणार

रत्नागिरी : औद्योगिक विकास महामंडळाच्या हरचेरी, असोडे आणि बावनदी धरणातील गाळ उपसण्यासाठी सन २०१९मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडे परवानगीचा प्रस्ताव दिला आहे. चार वर्षांचा कालावधी उलटल्यानंतरही जिल्हाधिकारी कार्यालयाने अद्यापर्यंत गाळ काढण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे यावर्षीही धरणातील गाळ उपसा होण्याची शक्यता कमी आहे.औद्योगिक विकास महामंडळाने सन १९७० मध्ये हरचेरी येथे धरण बांधले. सुमारे २.९७ दलघमी पाणी साठवण क्षमता या धरणाची आहे. परंतु, गेल्या ५५ वर्षात एकदाही धरणातील गाळ काढण्यात आलेला नाही. गाळामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता कमी होत आहे. यासाठी सन २०१९ मध्ये औद्योगिक विकास महामंडळाने हरचेरीसह असोडे (लांजा), बावनदी धराणातील गाळ उपसण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयाकडे  परवानगी मागितली होती. परवानगीची फाईल जिल्हाधिकारी कार्यालयात तब्बल चार वर्ष धूळखात पडून आहे.हरचेरी धरणावरून मिरजोळे, उद्यमनगर, एमआयडीसीसह रत्नागिरी शहराचा वरचा भाग तसेच नऊ ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. तर बावनदी धराणातून जिंदलसह जयगड पंचक्रोशीतील गावांना पाणी पुरवठा केला जातो.सध्या हरचेरी धरणात ६ जूनपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र, जून महिन्यात पाऊस लांबणीवर पडल्यास एमआयडीसीला पाणीटंचाईची झळ बसते. यावर्षी एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ एमआयडीसीवर आली आहे.  सद्यस्थितीत गाळ काढण्याचे काम होऊ शकते.परंतु, जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी न दिल्याने गाळ काढण्याचे काम सुरू करणे शक्य नाही.  एमआयडीसीच्या हरचेरी धरणात काही लाख हजार क्युबिक मीटर गाळ आहे. तर बावनदी, असोडे धरणाचीही हिच स्थिती आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिल्यानंतरच गाळ काढण्याच्या कामाला  सुरुवात होणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरण