शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पूररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक, राजापूरच्या विकासाला खीळ बसणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:58 IST

विनोद पवार राजा पूर : सन १९८३ साली अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरानंतर राजा पूर शहरात पूररेषा अस्तित्वात आली. गेली ...

विनोद पवारराजापूर : सन १९८३ साली अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरानंतर राजापूर शहरात पूररेषा अस्तित्वात आली. गेली चार दशके राजापूरचा विकास या जुन्या पूररेषेत अडकलेला असतानाच आता लघुपाटबंधारे विभागाने नव्याने पूररेषा रेखांकित केली आहे. फेरसर्वेक्षणाची मागणी मंजूर झाल्यानंतरही नवी पूररेषाच अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आता कोणत्याही नव्या कामाला परवानगी मिळणार नाही आणि त्यामुळेच ही पूररेषा विकासाच्या आडवी येणार आहे.साधारण तीन वर्षांपूर्वी गूगल मॅपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या नव्या पूररेषेला तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जोरदार विरोध केला होता. नगराध्यक्ष जमीर खलिफे व विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या मागणीनंतर तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेशही दिले होते.मात्र, शासनाचे पूररेषेचे सर्व नियम व पाटबंधारे विभागाचे निकष यानुसार तीच पूररेषा लागू करण्यात आली आहे आणि ही पूररेषा शहरासाठी बाधक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

आधीच उल्हास..उद्योगांचा आधार नसल्याने राजापुरात रोजगारांच्या उपलब्धतेला खूपच मर्यादा आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामीण भागातील लोक मोठ्या शहरांकडे गेल्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजापूर शहरावर मोठा परिणाम झाला आहे. आधीच शहरातील व्यवसाय मेटाकुटीला आलेले असताना आता नवी पूररेषा अधिकच त्रासदायक ठरणार आहे. या पूररेषेमुळे राजापूर शहराचा विकासही खुंटणार आहे. विकासाच्या दृष्टीने आजही काेसाे दूर असलेल्या राजापूर शहराच्या विकासात पूररेषेचा ठरणारा अटकाव वेळीच दूर हाेणे गरजेचे आहे. अन्यथा शहर विकासापासून दूर राहणार आहे.

आपण नगराध्यक्ष असताना लघुपाटबंधारे विभागाने राजापूरची पूररेषा वाढवली होती. त्यावेळी आपण शासनाकडे या नव्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. तरीही फेरसर्वेक्षणाअंती आता तीच पूररेषा लागू करण्यात आली आहे. या नव्या पूररेषेमुळे राजापूर शहराच्या विकासाला खीळ बसणार आहे. यावर शासनाने योग्य तो निर्णय घेऊन राजापूर शहराला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. - जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर