शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

Ratnagiri: तब्बल चार दशके अडथळा ठरलेल्या पूररेषेचा नवा फटका अधिक त्रासदायक, राजापूरच्या विकासाला खीळ बसणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 15:58 IST

विनोद पवार राजा पूर : सन १९८३ साली अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरानंतर राजा पूर शहरात पूररेषा अस्तित्वात आली. गेली ...

विनोद पवारराजापूर : सन १९८३ साली अतिवृष्टी होऊन आलेल्या महापुरानंतर राजापूर शहरात पूररेषा अस्तित्वात आली. गेली चार दशके राजापूरचा विकास या जुन्या पूररेषेत अडकलेला असतानाच आता लघुपाटबंधारे विभागाने नव्याने पूररेषा रेखांकित केली आहे. फेरसर्वेक्षणाची मागणी मंजूर झाल्यानंतरही नवी पूररेषाच अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आता कोणत्याही नव्या कामाला परवानगी मिळणार नाही आणि त्यामुळेच ही पूररेषा विकासाच्या आडवी येणार आहे.साधारण तीन वर्षांपूर्वी गूगल मॅपच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या या नव्या पूररेषेला तत्कालीन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी जोरदार विरोध केला होता. नगराध्यक्ष जमीर खलिफे व विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफे यांच्या मागणीनंतर तत्कालीन पाटबंधारे मंत्र्यांनी फेरसर्वेक्षणाचे आदेशही दिले होते.मात्र, शासनाचे पूररेषेचे सर्व नियम व पाटबंधारे विभागाचे निकष यानुसार तीच पूररेषा लागू करण्यात आली आहे आणि ही पूररेषा शहरासाठी बाधक असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत.

आधीच उल्हास..उद्योगांचा आधार नसल्याने राजापुरात रोजगारांच्या उपलब्धतेला खूपच मर्यादा आहेत. त्यामुळे राजापूर तालुक्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. ग्रामीण भागातील लोक मोठ्या शहरांकडे गेल्याने तालुक्याचे ठिकाण असलेल्या राजापूर शहरावर मोठा परिणाम झाला आहे. आधीच शहरातील व्यवसाय मेटाकुटीला आलेले असताना आता नवी पूररेषा अधिकच त्रासदायक ठरणार आहे. या पूररेषेमुळे राजापूर शहराचा विकासही खुंटणार आहे. विकासाच्या दृष्टीने आजही काेसाे दूर असलेल्या राजापूर शहराच्या विकासात पूररेषेचा ठरणारा अटकाव वेळीच दूर हाेणे गरजेचे आहे. अन्यथा शहर विकासापासून दूर राहणार आहे.

आपण नगराध्यक्ष असताना लघुपाटबंधारे विभागाने राजापूरची पूररेषा वाढवली होती. त्यावेळी आपण शासनाकडे या नव्या पूररेषेचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. तरीही फेरसर्वेक्षणाअंती आता तीच पूररेषा लागू करण्यात आली आहे. या नव्या पूररेषेमुळे राजापूर शहराच्या विकासाला खीळ बसणार आहे. यावर शासनाने योग्य तो निर्णय घेऊन राजापूर शहराला ऊर्जितावस्था प्राप्त होण्यासाठी प्रयत्न करावेत. - जमीर खलिफे, माजी नगराध्यक्ष, राजापूर

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरfloodपूर