शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

रत्नागिरीतील मुख्य रस्त्याचे १०० कोटींतून होणार काँक्रिटीकरण

By शोभना कांबळे | Updated: December 6, 2023 16:31 IST

शहर आणि परिसरातील १२५ कोटींच्या विकासकामांना १७ रोजी प्रारंभ

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या रत्नागिरी शहरातील विकासकामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर रोजी नगरपालिका करणार आहे. यात प्रमुख १७ कामांचा समावेश आहे. यात नगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामाचा समावेश असून, त्यासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी बुधवारी पत्रकारांना दिली. अनेक कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत.नगरोत्थान योजनेतून रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी ९६.९९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे, तसेच थिबा पॅलेस येथील थ्रीडी मॅपिंग मल्टी मीडिया शो (खुले नाट्यगृह) यासाठी २० काेटी आणि रत्नागिरीतील वि. दा. सावरकर नाट्यगृहाच्या कामालाही प्रारंभ झाला असून, त्यासाठी ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.त्याचबरोबर नाट्यगृहाच्या पाठीमागील खाऊ गल्ली चांगल्या प्रकारे विकसित करण्यात येणार आहे, तसेच शहरातील जिजामाता उद्यानाचे सुशोभीकरण, तसेच उद्यानाशेजारील खाऊ गल्लीही विकसित होणार आहे. यासाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. रत्नदुर्ग किल्ला येथे शिवसृष्टी विकसित करणे, तेलीआळी येथे उद्यान उभारणे, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमची दुरुस्ती, तसेच मागील बाजूला असलेल्या भाजी मार्केट आणि मच्छीमार्केट इमारतीच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम आदी विकासकामे वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून होणार आहेत.नगरोत्थान योजनेतून कोकण विभागातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार भारतरत्नने सन्मानित असलेल्या मान्यवरांच्या प्रतिकृतींचे सुशोभीकरण, ध्यान केंद्राचे बांधकाम, तारांगणशेजारील शिर्के उद्यानाचे सुशोभीकरण, शहरात विठ्ठलमूर्ती उभारण्यासाठी चबुतऱ्याचे बांधकाम करणे, सभोवतालचा परिसर सुशोभीकरण करणे, ही कामे होणार आहेत.यापैकी तारांगण आणि विठ्ठलमूर्ती चबुतरा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी जे जे स्कूल ऑफ आर्ट यांच्याकडे सव्वाकोटीचा निधी वर्ग करण्यात आल्याचे यावेळी मंत्री सामंत यांनी सांगितले. या सर्व कामांचा शुभारंभ येत्या १७ डिसेंबर राेजी करण्यात येणार आहे.

चिपळूण घरपट्टी कार्यवाहीला स्थगितीचिपळूण नगरपालिकेच्या हद्दीतील काही मालमत्ताधारकांना वाढीव घरपट्टी आकारणी केली जात आहे. याच्या विरोधात नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत माहिती देताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, घरपट्टी आकारणीवरून नागरिकांमध्ये गैरसमज झाला आहे. याबाबत बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. जनतेच्या भावनांचा विचार करून घरपट्टी कार्यवाहीला स्थगिती देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक