शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

दिवसा घरी अन् रात्री निवारा केंद्रावर!, चिपळुणात कायमस्वरूपी स्थलांतराचा प्रश्न 

By संदीप बांद्रे | Updated: August 1, 2023 16:44 IST

प्रशासनासमोर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न

चिपळूण : रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी - ठाकूरवाडी आदीवासी पाड्यावर डोंगर कोसळल्याची घटना घडल्यानंतर तालुक्यातील १३ गावांमधील १२२३ लोकांच्या स्थलांतराचा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे. त्यातील ७१ जणांचे तात्पुरते स्थलांतर करण्यात आले आहे. काहीजण दिवसा घरी आणि रात्री जिल्हा परिषद शाळेत सुरू केलेल्या निवारा केंद्रावर वस्ती करीत आहेत. तीन गावामध्ये काही कुटुंब तात्पुरती स्थलांतरित झाली असली, तरी उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.दरडीचा धोका असलेल्या १३ ग्रामपंचायत परिसरातील ३६ वाड्यांमधील ३४१ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत होण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या.येथील लोकांचे तात्पुरते पुर्नवसन होण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळा व काही समाज मंदिरांमध्ये २६ निवारा केंद्रे उभारण्यात आली आहेत. परंतु एक दोन गावांमध्येच स्थलांतरची प्रक्रिया सुरु झाली आहे. तालुक्यात ज्या-ज्या ठिकाणी संभाव्य धोका आहे अशा ठिकाणी जाऊन अधिकारी स्थानिकांना स्थलांतरित होण्यासाठी समजूत घालत आहेत. परंतु तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर होण्यास कोणीच तयार नसल्याचे देखील समोर येत आहे.चिपळूण मधील परशुराम घाटात दरडीचा धोका कायम आहे. येथे डोंगरावर परशुराम गाव, तर डोंगराच्या पायथ्याशी पेढे गाव वसलेले आहे. २०२१ साली अतिवृष्टीमुळे पेढे गावातील काही घरावर दरड कोसळली होती. त्यामध्ये तिघांचा मृत्यू देखील झाला होता. तालुक्यात अनेक ठिकाणी अशी धोकादायक परिस्थिती आहे. त्याचे सर्वेक्षण देखील प्रशासनाकडून करण्यात आले असून स्थानिकांना स्थलांतराच्या नोटिसा देखील देण्यात आले आहेत. पावसाळी काळात चार महिन्यासाठी स्थलांतरित करता यावे यासाठी २५ पथके देखील तैनात करण्यात आली आहेत. ग्रामीण भागात १८, तर शहरी भागात ७ पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.तूर्तास तालुक्यातील २१ कुटुंबातील ७१ जणांचे स्थलांतर केले आहे. यामध्ये कादवड धनगर वाडीतील ८ कुटुंबांमधील १९ जणांपैकी ६ जण खेर्डी येथे नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. उर्वरित १३ जण गावच्या जिल्हा परिषद शाळेत केवळ रात्रीच्या वेळी वस्ती करतात आणि दिवसा घराकडे राहतात. कोळकेवाडी मधील १८ जणांपैकी १० जण नातेवाईकांकडे राहतात. तसेच येगाव सुतारवाडी व ठोकबावमधील १० कुटुंबातील ४२ जण जिल्हा परिषद शाळेत वास्तव्य करीत आहेत. उर्वरित १० गावांमधील लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कायम आहे.

या गावातील ग्रामस्थांना नोटीस

पेढे कुभांरवाडी, परशुराम घाटमाथा, तिवरे येथील गावठाणवाडी, कातकरवाडी, भेंदफणसवाडी, भेंद-धनगरवाडी, कुंभारवाडी, गंगेचीवाडी. तिवडीतील राळेवाडी, उगवत वाडी, भटवाडी. रिक्टोली येथील इंदापुर वाडी, मावळतवाडी, गावठाणवाडी, मधलीवाडी, बौध्दवाडी, देऊळवाडी. नांदिवसे मधील राधानगर, स्वयंदेव, वाकरी धनगरवाडी, बावलाई धनगरवाडी. कादवड धनगरवाडी, ओवळी येथील काळकाई - धनगरवाडी, धामनदी - धनगरवाडी, बुरंबवणेवाडी, खेंड- धनगरवाडी. कळकवणे येथील रांगी धनगरवाडी, खलीफा धनगरवाडी. कोळकेवाडी मधील खारवार- धनगरवाडी, हसरेवाडी, जांभराई धनगरवाडी, कोळवणे धनगरवाडी, माच धनगरवाडी, बोलाडवाडी.  पिंपळी बुद्रुक, कुभार्ली येथील लांबेवाडी,  पेढांबेतील दाभाडी, रींगी धनगरवाडी. येगाव येथील ढोकबाव  सुतारवाडी. कळंबट गवळीवाडी आणि गोवळकोट बौद्दवाडी व मोहल्ला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन