शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत ३६ तासानंतर चांदेराई, हरचेरी बाजारपेठेतील पुराचे पाणी उतरले

By अरुण आडिवरेकर | Updated: July 28, 2023 14:09 IST

रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी,  सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी ) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. ...

रत्नागिरी : तालुक्यात मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे बुधवारी,  सायंकाळी ६ वाजता चांदेराई (ता. रत्नागिरी) बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले होते. मात्र,‌ आज   शुक्रवारी पावसाने उसंत घेतल्याने पहाटे ६ वाजता बाजारपेठेतील पूर्ण पाणी ओसरले आहे.चांदेराई बाजारपेठेतील लहान मोठी १०० पेक्षा अधिक दुकाने बाधित झाली तर चांदेराईमध्ये ५ ते ६ घरे तर हरचेरीमध्ये अनेक घरे या पुरात बाधित झाली आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल साचलाय तर चांदेराई पुलावर कठडा २ वर्षांपूर्वी दुरुस्त केलेला तुटला आहे. चिंद्रावली रस्ता खचला तर रत्नागिरी देवधे महामार्ग चांदेराई मलुष्ट्येवाडी येथे नदीपात्र वळण दुरुस्ती व गॅबीयन वॉलचे काम निविदा होऊनही पावसाळ्यापूर्वी न केल्याने नदीकिनाऱ्यावरची दरड अजून कोसळली आहे. त्यामुळे या रस्त्यावर जीवितहानी होण्याची भीती वाढली आहे.या वर्षी नदीपात्रातील गाळ बाहेर न काढल्याने तो गाळ परत नदीपात्रात गेला. चांदेराई पुलाच्या वरच्या बाजूला किमान २ किमी व खालच्या बाजूला १ किमी गाळ उपसा करून तो गाळ नदी पात्रातून बाहेर काढल्यास तसेच हरचेरी कसबा या ठिकाणचा २ किमीमधील गाळ काढल्यास चांदेराई व हरचेरीवासीयांचा  प्रती वर्षाचा पुराचा त्रास कमी होईल व मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांचे होणारे नुकसान टळेल, असे मत चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनी मांडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसfloodपूर