शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

कोकणातील कासवांचे पहिले रहस्य उलगडले, ट्रान्समीटर लावलेल्या सावनीने दुसऱ्यांदा घातली अंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 19:17 IST

अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाउंडेशनने घेतला होता

मंडणगड : गेल्या महिन्यात वन विभाग आणि भारतीय वन्यजीव संस्थांतर्गत (डब्लूआयआय) आंजर्ले किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेल्या सावनी नामक मादी कासवाने पुन्हा एकदा अंडी दिली आहेत. शुक्रवार, दि. २५ रोजी पहाटे केळशीच्या किनाऱ्यावर सावनी अंडी घालताना आढळली. भारताच्या किनारपट्टीवर सागरी कासव विणीच्या हंगामात ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचा हा पहिलाचा पुरावा आहे.दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यादरम्यान ऑलिव्ह रिडले प्रजातीची मादी कासवे कोकण किनारपट्टीवर अंडी घालण्यासाठी येतात. अरबी समुद्रातील या कासवांचा अधिवास आणि स्थलांतर जाणून घेण्यासाठी त्यांच्या पाठीवर सॅटेलाईट ट्रान्समीटर लावण्याचा निर्णय मँग्रोव्ह फाउंडेशनने घेतला होता. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात वेळास, आंजर्ले आणि गुहागर किनाऱ्यावर मिळून एकूण पाच मादी कासवांना सॅटेलाईट ट्रान्समीटर लावून पुन्हा समुद्रात सोडण्यात आले.गेल्या काही दिवसांपासून या माद्यांच्या समुद्रातील हालचालींवर डब्लूआयआय आणि मँग्रोव्ह फाउंडेशनमधील संशोधक लक्ष ठेवून होते. अशातच शुक्रवारी पहाटे सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेली एक मादी केळशीच्या किनाऱ्यावर अंडी घालताना कासवमित्र राकेश धोपावकर आणि लहू धोपावकर यांना आढळून आली. त्यांनी लागलीच यासंबंधीची माहिती मँग्रोव्ह फाउंडेशनला दिली.२५ जानेवारी रोजी आंजर्ले समुद्र किनाऱ्यावर एका मादी कासवाने ८७ अंडी घातली होती. तिला सॅटेलाईट ट्रान्समीटर बसवून तिचे नामकरण सावनी असे करण्यात आले. गेले महिनाभर समुद्रात वावर केल्यानंतर तिने २५ फेब्रुवारी रोजी केळशी येथे पहाटे चार वाजता ७६ अंडी घातली आहेत. कोकण किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या माद्या विणीच्या हंगामात एकाहून अधिक वेळा अंडी घालण्यासाठी येतात, हे त्यामुळे पुराव्यानिशी समजले आहे.सावनीला टॅग करणारे डब्लूआयआयचे संशोधक डाॅ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, गेल्या महिन्याभरात सावनीचा वावर किनारपट्टीपासून १० किमी अंतरादरम्यान होता. ती सावित्री नदीच्या मुखाशी गेली होती. त्यानंतर ती वेळास ते आंजर्ले दरम्यानच्या सागरी परिक्षेत्राच वावरत होती. सरतेशेवटी तिने शुक्रवारी केळशीच्या किनाऱ्यावर अंडी घातली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी