शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

परशुराम घाटात काँक्रीटीकरणाला तडे, मातीचा भरावही खचतोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2023 11:52 IST

घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला

चिपळूण : मुसळधार पावसात सोमवारी (३ जुलै) मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटात नव्याने करण्यात आलेल्या काँक्रीटीकरणाला तडे गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. घाटात काँक्रीटीकरणाच्या खालील मातीचा भरावही खचत असल्याने महामार्गाला तडे गेले आहेत. परिणामी घाटातील प्रवास काहीसा धोकादायक बनला आहे. खचलेल्या रस्त्याचा वाहतुकीला कोणताही धोका नसून, पावसाळ्यानंतर खचलेल्या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग महाड विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.परशुराम घाट सुमारे ५.४० किलोमीटर लांबीचा आहे. घाटातील काँक्रीटीकरणाची एक मार्गिका पूर्णत्वाला गेली आहे. घाटातील लांबीपैकी १.२० किलोमीटर लांबी ही उंच डोंगररांगा व खोल दऱ्या असल्याने डोंगर कटाईनंतर या भागात गेल्या आठवडाभरापासून दगड, माती अधूनमधून कोसळत आहे. गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणीही केली होती. त्यातच सोमवारी घाटातील काँक्रीटीकरणाला तडे गेल्याचे समोर आले आहे. घाटात शंभर मीटरचे काँक्रीटीकरण नुकतेच करण्यात आले होते. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीला खुला करण्यात आला. आता याच मार्गावर काँक्रीटीकरणाला तडे गेले आहेत.घाटात रस्त्याला तडे गेल्यानंतर पेढे सरपंच आरुषी शिंदे, उपसरपंच अष्टविनायक टेरवकर, ग्रामविकास अधिकारी नारायण कटरे, ग्रामस्थ बबन पडवेकर, बंटी शिंदे आदींनी या भागाची पाहणी केली. घाटात चौपदरीकरण करणाऱ्या कल्याण टोलवेज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या भागाची पाहणी केली. महामार्गाला तडे गेले तरी वाहतुकीला त्याचा धोका नाही. पावसाळ्यानंतर या भागात नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीroad transportरस्ते वाहतूक