शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:55 IST

गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता

हर्षल शिराेडकरखेड : पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटकांना आकर्षित करतो. उंच उंच कडे, दाट धुके आणि थंडगार वातावरण अनुभवण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई आदी महानगरातील पर्यटकांची पावले आपोआप या घाटाकडे वळतात. मात्र, गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे आता यावर्षी हा घाट पर्यटकांसाठी खुला ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमाेर राहणार आहे.पावसाळ्यात रघुवीर घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध हाेताे. घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची आहे. खोपी, शिंदी,वळवण,बामणोली मार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमतो. सारेच अद्भूत आणि विलोभनीय मनाला संजीवनी देणारे असल्याने पर्यटकांना ते आकर्षित करते.घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे. खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, कुळवंडी, बिजघर, मिर्ले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुणावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या घाटात पावसाळ्यात आढळणारे लाल खेकडे येथील विशेष आकर्षण आहेच, शिवाय धबधबे पर्यटकांसाठी मनमोहक ठरत आहेत. रघुवीर घाटात लहान-मोठे अनेक धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

मात्र, पावसाळ्यामध्ये अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अडकून पडण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येताे. त्याचा परिणाम येथील व्यवसायावर हाेत आहे. हा घाट पावसाळ्यात सुरू ठेवण्याचे आव्हान राहणार आहे.

पावसाळ्यात येथे पर्यटक येत असल्याने आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. तर कांदाटी खोऱ्यातील लोकांचा जगाशी संपर्क राहतो. सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने घाटाची दुरुस्ती तातडीने करून पावसाळ्यात पर्यटनासाठी घाट उपलब्ध करून द्यावा. - अनिल भोसले, हॉटेल व्यावसायिक, रघुवीर घाट.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन