शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:55 IST

गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता

हर्षल शिराेडकरखेड : पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटकांना आकर्षित करतो. उंच उंच कडे, दाट धुके आणि थंडगार वातावरण अनुभवण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई आदी महानगरातील पर्यटकांची पावले आपोआप या घाटाकडे वळतात. मात्र, गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे आता यावर्षी हा घाट पर्यटकांसाठी खुला ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमाेर राहणार आहे.पावसाळ्यात रघुवीर घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध हाेताे. घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची आहे. खोपी, शिंदी,वळवण,बामणोली मार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमतो. सारेच अद्भूत आणि विलोभनीय मनाला संजीवनी देणारे असल्याने पर्यटकांना ते आकर्षित करते.घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे. खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, कुळवंडी, बिजघर, मिर्ले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुणावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या घाटात पावसाळ्यात आढळणारे लाल खेकडे येथील विशेष आकर्षण आहेच, शिवाय धबधबे पर्यटकांसाठी मनमोहक ठरत आहेत. रघुवीर घाटात लहान-मोठे अनेक धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

मात्र, पावसाळ्यामध्ये अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अडकून पडण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येताे. त्याचा परिणाम येथील व्यवसायावर हाेत आहे. हा घाट पावसाळ्यात सुरू ठेवण्याचे आव्हान राहणार आहे.

पावसाळ्यात येथे पर्यटक येत असल्याने आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. तर कांदाटी खोऱ्यातील लोकांचा जगाशी संपर्क राहतो. सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने घाटाची दुरुस्ती तातडीने करून पावसाळ्यात पर्यटनासाठी घाट उपलब्ध करून द्यावा. - अनिल भोसले, हॉटेल व्यावसायिक, रघुवीर घाट.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन