शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
3
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
4
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
5
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
6
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
7
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
8
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
9
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
10
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
11
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
12
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
13
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
14
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
15
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
16
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
17
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
18
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
19
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
20
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!

Ratnagiri- पावसाळ्यात रघुवीर घाट खुला ठेवण्याचे आव्हान, स्थानिकांच्या दळणवळणासह रोजगाराचाही प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 12:55 IST

गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता

हर्षल शिराेडकरखेड : पावसाळा सुरू झाल्यानंतर पुढील पंधरा दिवसांत खेड तालुक्यातील रघुवीर घाट पर्यटकांना आकर्षित करतो. उंच उंच कडे, दाट धुके आणि थंडगार वातावरण अनुभवण्यासाठी जिल्ह्यासह पुणे, मुंबई आदी महानगरातील पर्यटकांची पावले आपोआप या घाटाकडे वळतात. मात्र, गतवर्षी घाटातील दुरवस्थेमुळे हा घाट पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला हाेता. त्यामुळे आता यावर्षी हा घाट पर्यटकांसाठी खुला ठेवण्याचे आव्हान प्रशासनासमाेर राहणार आहे.पावसाळ्यात रघुवीर घाटात अनेक पर्यटक घाटाचे सौंदर्य न्याहाळत पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. त्यातून मोठ्या प्रमाणात स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध हाेताे. घाटाची समुद्रसपाटीपासून ७६० मीटर उंची आहे. खोपी, शिंदी,वळवण,बामणोली मार्गे तापोळ्याकडून फेरीबोटीने पर्यटकांना महाबळेश्वरला जाता येते. याकरिता हा एक चांगला मार्ग आहे. निसर्ग पर्यटन करताना विविध प्रकारचे पक्षी, त्यांचे आवाज, विविध प्रकारचे लहान-मोठे प्राणी, सरपटणारे प्राणी, वाऱ्याचा सळसळणारा आवाज कानात घुमतो. सारेच अद्भूत आणि विलोभनीय मनाला संजीवनी देणारे असल्याने पर्यटकांना ते आकर्षित करते.घाट परिसरात अनेक प्रेक्षणीय स्थळे असल्याने हा घाट रोजगार निर्मितीला चालना देणारा ठरत आहे. खेड ते रघुवीर घाट या मार्गावरील वेरळ, हेदली, सवेणी, ऐनवरे, कुळवंडी, बिजघर, मिर्ले आदी ठिकाणी प्रेक्षकांना खुणावणारी अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. या घाटात पावसाळ्यात आढळणारे लाल खेकडे येथील विशेष आकर्षण आहेच, शिवाय धबधबे पर्यटकांसाठी मनमोहक ठरत आहेत. रघुवीर घाटात लहान-मोठे अनेक धबधबे सर्वांचेच लक्ष वेधून घेतात.

मात्र, पावसाळ्यामध्ये अनेकवेळा रस्त्यावर दरड येते. गेली दोन-तीन वर्षे या घाटामध्ये परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस अडकून पडण्याची घटना घडल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येताे. त्याचा परिणाम येथील व्यवसायावर हाेत आहे. हा घाट पावसाळ्यात सुरू ठेवण्याचे आव्हान राहणार आहे.

पावसाळ्यात येथे पर्यटक येत असल्याने आम्हाला रोजगार उपलब्ध होतो. तर कांदाटी खोऱ्यातील लोकांचा जगाशी संपर्क राहतो. सध्याची घाटाची परिस्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना म्हणून बांधकाम विभागाने घाटाची दुरुस्ती तातडीने करून पावसाळ्यात पर्यटनासाठी घाट उपलब्ध करून द्यावा. - अनिल भोसले, हॉटेल व्यावसायिक, रघुवीर घाट.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन