शहरं
Join us  
Trending Stories
1
'कोणत्याही व्यासपीठावर नरेंद्र मोदींशी चर्चेस तयार, पण...', राहुल गांधीनी निमंत्रण स्वीकारले
2
GT च्या सलामीवीरांची शतकं! 'करा किंवा मरा'च्या सामन्यात 'सु'दर्शन; CSK समोर तगडे लक्ष्य
3
India vs Pakistan: "पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असेल तर असू द्या, आमच्या भारताकडे PM Modi आहेत"; Tejasvi Surya यांचा Manishankar Iyer यांना टोला
4
ब्रिजभूषण शरण सिंहांना कोर्टाचा मोठा धक्का; कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित करण्याचे आदेश 
5
IPL 2024 GT vs CSK : CSK ची बेक्कार धुलाई! शुभ-साई दोघेही 'शतकवीर', यजमानांचा झंझावात
6
नरेंद्र मोदी हे २१ व्या शतकातील राजा, ते लोकांचे ऐकत नाहीत - राहुल गांधी
7
ऐकावं ते नवलंच! 1990पासून जमवली होती 'पोकेमॉन कार्ड्स', लागली लाखोंची बोली, किंमत ऐकून थक्क व्हाल
8
BAN vs ZIM : आंतरराष्ट्रीय क्रिकेट म्हणावं की गल्ली क्रिकेट; झिम्बाब्वेची फिल्डिंग पाहून पिकला हशा
9
छत्तीसगडच्या विजापूरमध्ये चकमक, आतापर्यंत 6-8 नक्षलवादी ठार; आकडा वाढणार...
10
लखनौचे मालक राहुलवर भडकले अन् गंभीरने शाहरूख खानवर उधळली स्तुतीसुमने, वाचा
11
IPL 2024 GT vs CSK : चेन्नईने टॉस जिंकला! ऋतुराजने १ बदल केला, शुबमनने दोघांना बाकावर बसवले
12
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
13
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
14
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
15
"इंडिया' आघाडीकडून नव्या पद्धतीच्या जिहादची सुरुवात; उद्धव ठाकरे 'वोट जिहाद'चे आका"; आशिष शेलार यांचे टीकास्त्र
16
"भारतात आधी देखील BJP ची सत्ता होती पण...", शाहिद आफ्रिदीचे टीकास्त्र, म्हणाला...
17
"तुमचं माझ्यावरचं, माझं तुमच्यावरचं प्रेम 'अक्षय' राहो..", प्राजक्ता माळीने केली नव्या सिनेमाची घोषणा
18
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
19
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
20
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप

टोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषध, विनय नातू यांनी उडविली खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 5:10 PM

कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

ठळक मुद्देटोपेंचे औषध नको म्हणून ठाकरेंचे औषधमाझे कुटुंब माझी जबाबदारी योजनेची विनय नातू यांनी उडविली खिल्ली

चिपळूण : कोरोना परिस्थितीत आरोग्य मंत्री राजेश टोपे चांगल्या पद्धतीने काम करत असताना त्यांचे औषध नको म्हणून माझे कुटुंब माझी जबाबदारी या उपक्रमांतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवे औषध पुढे आणले. यात वेगळे असे काहीच केले नाही. उलट अनेक गोष्टी सुचवूनही त्याची दखल सरकारने घेतली नसल्याची खंत माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी सोमवारी चिपळूण येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.केंद्र सरकारने केलेल्या कृषी विधेयकामुळे कोकणचा मोठा फायदा होणार असल्याची भूमिका डॉ. नातू यांनी स्पष्ट केली. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पद्धतीने कोकणातील कृषी क्षेत्राला उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवाय आंबा, काजू बागायतदार व मच्छी व्यवसायिकांचीही सर्व करांपासून सुटका होणार असून या विधेयकामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचे स्पष्ट केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेबाबतची माहिती देताना त्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपासून आरोग्य जे काम करीत आहे, तेच काम आता ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण या उपक्रमांतर्गत केले जात आहे. त्यातून आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांवरचा ताण वाढला आहे. तेच काम पुन्हा पुन्हा करावे लागत आहे. शिवाय तपासणी व सर्वेक्षण केल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला जात नसल्याने केलेल्या कामाचा काहीच उपयोग होताना दिसत नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणVinay Natuविनय नातूUddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरीcorona virusकोरोना वायरस बातम्या