शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
3
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
4
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
5
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
6
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
7
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
8
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
9
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
10
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
11
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
12
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
13
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
14
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
15
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
16
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
17
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
18
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
19
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
20
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...

दहा महिने लोटले तरीही अद्याप राजापुरात गंगामाई प्रवाहीत, मात्र भाविकांनी गंगामाईकडे फिरवली पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 17:06 IST

गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते.

राजापूर : गत वर्षी देशभरात कोराना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरू असताना राजापुरातील उन्हाळे येथील गंगामाईचे ३० एपिल रोजी आगमन झाले होते. त्यानंतर दहा महिने लोटले तरीही अद्याप प्रवाहीत आहे. मात्र भाविकांनी गंगामाईकडे पाठ फिरविल्याचे सध्याचे चित्र आहे.

गंगा क्षेत्रातील चौदाही कुंडांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काशिकुंड तुडूंब भरल्याने गोमुखातून अखंड पाण्याचा स्त्रोत  सुरू  आहे. मात्र काही कुंडातील पाण्यावर शेवाळी आलेली दिसून येत आहे.सर्वसाधारणपणे दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते. जवळपास तीन महिन्याच्या वास्तव्यानंतर ती अंतर्धान पावते असा पघात आहे. मात्र अलिकडच्या कालावधीत तिच्या या आगमन व निर्गमनच्या सर्वसाधारण नियमित कालखंडाला छेद गेला आहे. हे सन २०१३ पासून चालू झाले आहे. काही वर्षे तर सलग आली होती. तर, काही वर्षापूर्वी तिच्या वास्तव्याचा कालावधीही खुपच लांबला होता.

यावेळी १ वर्ष १४ दिवसांनी गंगामाईचे आगमन झाले होते. अद्यापही गंगा क्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने भरली आहेत. मात्र मुळ गंगा, गायमुख व गायमुखा जवळील कुंड वगळता सर्व कुंडाच्या पाण्यावर शेवाळी पसरली आहे. सर्वात मोठे असणारे काशिपुंड पूर्ण भरलेले असून गोमुखातून पाणी वाहत आहे. मुळ गंगेचा प्रवाहही अद्याप चांगल्या स्वरूपात वाहत आहे.गतवर्षी ३० एपिल २०२१ ला गंगामाईचे आगमन झाले. गंगामाईचे आगमन झाल्यापासून १० महिने झाले तरी येथील सर्वच कुंडातील पाणी अद्यापही प्रवाहीत आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे यापुर्वी स्थानिक प्रशासनाकडुन गंगाक्षेत्रावर भाविकांना जाण्यास मनाई आदेश बजावण्यात आला होता. त्यामुळे गंगा आगमनानंतर या ठिकाणी होणारी भाविकांची गर्दी, दुकानांची रेलचेल आणि त्याद्वारे होणारी लाखोंची आर्थिक उलाढाल ठप्प झाली होती.

सद्यस्थितीत मुळगंगेसह चंद्रकुंड, सुर्यकुंड, नर्मदाकुंड, गोदावरी कुंड, चंद्रभागा कुंड, बाणकुंड, सरस्वती कुंड, कावेरीकुंड, भिमाकुंडामध्ये पाणी असून काशीकुंडातील पाणी गोमुखातून वाहत आहे. तर मुळ गंगाही अद्याप प्रवाहीत आहे.कोरोनाच्या संसर्गानंतर गंगाक्षेत्राला देखील चांगलाच फटका बसला आहे. गंगेच्या आजवरच्या इतिहासात एवढा परीणाम झाला नव्हता. गंगेच्या आगमन व अंतर्धान पावण्याच्या क्रियेत बदल झाल्यामुळे या स्थानावरील अर्थव्यवस्थेवर प्रथम परिणाम झाला होताच. मात्र कोरोना काळात तर येथील अर्थव्यवस्था थांबल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुर