शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

हवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 13:33 IST

कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.

ठळक मुद्देहवामान अन् राजकारणाने कासव महोत्सव बिघडलाकासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज

मंडणगड : कासव महोत्सवासाठी आलेल्या पर्यटकांच्या पदरी निराशा आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत. दिनांक ८ मार्चपासून वेळास येथे कासव महोत्सवाला सुरूवात झाली. मात्र, १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू घरट्यांमधून बाहेर न आल्याने कासव महोत्सवासाठी आलेले पर्यटक नाराज झाले आहेत.बदलत्या हवामानामुळे नियमित कालावधीमध्ये पिल्लं बाहेर आली नसल्याचे कारण वन विभाग सांगत असला तरी कासव संवर्धनामधील ही मोठी कमतरता म्हणावी लागणार आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपासून वेळास येथे आलिव्ह रिडले या दुर्मीळ कासवांच्या घरट्यांचे संरक्षण केले जात आहे. यावर्षी १३ घरट्यांमधील १५०० अंड्यांचे संरक्षण करण्यात आल्याने त्यातून १५०० पिल्ले बाहेर पडणार आहेत. त्यासाठी दिनांक ८ मार्च ते ६ एप्रिल असा कालावधी निश्चित धरण्यात आला आहे.यापैकी पहिल्या घरट्यामधून ८ मार्च रोजी कासवांची पिल्ले बाहेर येणार होती. मात्र, तीन दिवस उशिरा म्हणजे सोमवारी ११ मार्च रोजी केवळ ८ पिल्ले बाहेर आली. दरवर्षी कासव महोत्सवाची तारीख देण्याआधी सुरूवातीला एक ते दोन घरट्यांमधून पिल्लं बाहेर आल्याची खात्री केली जाते. त्यानंतरच उर्वरित घरट्यांमधूून पिल्लं बाहेर येण्याचे अनुमान लावले जात होते. यावर्षी मात्र असे न करता प्रत्यक्ष कासव महोत्सवाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यामुळे वेळास येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक ७ तारखेपासूनच दाखल झाले होते. मात्र, दिनांक १० मार्चपर्यंत एकही कासवाचे पिल्लू वाळूमधून बाहेर न आल्याने पर्यटक नाराज झाले आहेत.यावर्षी कासव महोत्सवाबरोबरच रॉक क्लायबिंग, झिप लाईन, स्लॅक लाईन, व्हॅली क्रॉसिंग, रायफल शुुटिंग, बरमा ब्रिज, आर्चरी, सुमो फाईट यासारख्या उपक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. त्याची प्रसिद्धीही मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे यावर्षी कासव महोत्सवासाठी मुंबई, पुणेसह संपूर्ण राज्यातून मोठ्या आशेने पर्यटक वेळासमध्ये दाखल झाले होते. मात्र, हवामानातील बदलामुळे ना कासवे पाहायला मिळाली व गावातील अंतर्गत वादामुळे अ‍ॅडव्हेंचर गेमही खेळता आले नाहीत. यावर्षी प्रथमच टर्टल टुरिझम सोसायटी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वन विभाग यांच्यामार्फत या कासव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी