शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईला आंतरराष्ट्रीय शहर म्हटल्याचा अर्थ असा नाही की..."; अनामलाई यांचे राज ठाकरेंना उत्तर
2
हृदयद्रावक! १०० रुपयांचा टोल वाचवायला शॉर्टकट घेतला अन् जीव गेला; इंजिनिअरसोबत काय घडलं?
3
वळून वळून पाहू लागले...! डस्टरपूर्वी रेनोची राफेल भारतात लँड झाली; रस्त्यावरही धावताना दिसली...
4
बेरोजगारीवरुन टोमणे, मैत्रिणींच्या पतींशी तुलना, लेकीचा चेहराही पाहू देईना; पतीने संपवलं जीवन
5
लंडनहून भारतात आला, ६ दिवस गुपचूप गोठ्यात लपला अन्...; फॉरेन रिटर्न लेकानेच आईला संपवलं!
6
२५,०००,००० रुपयांची सॅलरी! बर्कशायर हॅथवेच्या CEO च्या कमाईनं वॉरेन बफे यांनाच टाकलं मागे
7
रात्री आई-वडिलांना जेवणातून द्यायची गुंगीचं औषध, मग प्रियकरासोबत... ८ वीतल्या मुलीचं भयंकर कृत्य!
8
इराण पेटला! ५०० आंदोलकांचा बळी, संतापलेले ट्रम्प घेणार मोठा निर्णय; युद्धाची ठिणगी पडणार?
9
डिसेंबरमध्ये 'बजाज-एथर'मध्ये चुरस रंगली! थोडक्यात संधी हुकली..., ओला स्कूटरची विक्री किती झाली? 
10
वर्षाची १३ नाही तर १० च रिचार्ज मारा! जिओने लाँच केला ३६ दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन, खास ऑफरमध्ये...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा अजब कारभार! स्वतःला घोषित केलं व्हेनेझुएलाचे 'कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष'
12
US Tariffs Impact: ३० लाख नोकऱ्यांवर टांगती तलवार, अनेक कारखाने होतील बंद; ट्रम्प टॅरिफच्या भितीनं कोणी दिला हा इशारा?
13
जमिनीचे पैसे मिळताच बायकोने दिला नवऱ्याला धोका; लाखो रुपये, दागिने घेऊन बॉयफ्रेंडसोबत पसार
14
कोणता पक्ष कोणासोबत आणि कुठे मैत्री करतोय, कुठे नुराकुस्ती खेळतोय... २९ महापालिकांचे चित्र एकाच क्लिकवर...
15
No Shah...! अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये खामेनेईंविरोधातील रॅलीत घुसला ट्रक, अनेकांना चिरडलं
16
नोकरी बदलताना ईपीएफचं काय होतं, पैसे सुरक्षित राहतात का? काय म्हणतो नियम, जाणून घ्या
17
अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
18
"तुमच्या फील्डमध्ये नंबर १ कोण आहे?", रितेशच्या प्रश्नावर उत्तर देताना राधा पाटीलने गौतमीला डिवचलं, म्हणाली...
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मतदानाआधी पैसे देणार का? आयोगाची विचारणा, आज खुलासा करण्याचे आदेश
20
रिलायन्सला मोठा झटका! चीनचा तंत्रज्ञान देण्यास नकार; लिथियम-आयन बॅटरी सेल निर्मिती प्रकल्प तूर्तास स्थगित
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:35 IST

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्यामुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार

रत्नागिरी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.शहरातील नळपाणी योजना जुनाट झाल्याने ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या गेली पाच वर्षे निर्माण होत आहे. या समस्येमुळे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या ६३ कोटी खर्चाच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याला लागलेले ग्रहण सुटणार आहे.यंदा रत्नागिरी शहरातील खासगी विहिरीही एप्रिलअखेर व मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्या. रडतखडत सुरू असलेल्या रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मे महिन्यात टॅँकरचेच पाणीशहरवासियांना मे महिन्यात दररोज टॅँकरच्या ५५ फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मे महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागात नागरिकांना तब्बल साडेसोळाशे फेऱ्यांमार्फत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यावेळी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.मुख्य जलवाहिनीचे काम सुरुरत्नागिरी शहराच्या सुधारित नळपाणी योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साळवी स्टॉप ते शीळमधील पाटीलवाडीपर्यंत जलवाहिनी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील जॅकवेलपर्यंतचे ५०० मीटरमधील जलवाहिनी उभारणीचे काम बाकी आहे.जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन जलवाहिनीतून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शीळचे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी