शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:35 IST

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्यामुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार

रत्नागिरी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.शहरातील नळपाणी योजना जुनाट झाल्याने ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या गेली पाच वर्षे निर्माण होत आहे. या समस्येमुळे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या ६३ कोटी खर्चाच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याला लागलेले ग्रहण सुटणार आहे.यंदा रत्नागिरी शहरातील खासगी विहिरीही एप्रिलअखेर व मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्या. रडतखडत सुरू असलेल्या रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मे महिन्यात टॅँकरचेच पाणीशहरवासियांना मे महिन्यात दररोज टॅँकरच्या ५५ फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मे महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागात नागरिकांना तब्बल साडेसोळाशे फेऱ्यांमार्फत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यावेळी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.मुख्य जलवाहिनीचे काम सुरुरत्नागिरी शहराच्या सुधारित नळपाणी योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साळवी स्टॉप ते शीळमधील पाटीलवाडीपर्यंत जलवाहिनी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील जॅकवेलपर्यंतचे ५०० मीटरमधील जलवाहिनी उभारणीचे काम बाकी आहे.जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन जलवाहिनीतून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शीळचे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी