शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
2
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
3
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
4
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
5
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
6
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
7
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
8
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
9
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
10
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
11
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
12
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
13
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
14
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
15
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
16
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
17
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
18
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
19
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
20
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन

रत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 16:35 IST

रत्नागिरी शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरीत धावल्या १५ दिवसात टॅँकरच्या ७०० फेऱ्यामुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार

रत्नागिरी : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेकडून १५ प्रभागांमध्ये गेल्या १ जूनपासून टॅँकरच्या ७००पेक्षा अधिक फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा करण्यात आला आहे. गेल्या बुधवारपासून शहराचे दोन विभाग करून प्रत्येक विभागाला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे टॅँकर मागणीत काही प्रमाणात घट झाली आहे.शहरातील नळपाणी योजना जुनाट झाल्याने ऐन पावसाळ्यातही पाणीटंचाईची समस्या गेली पाच वर्षे निर्माण होत आहे. या समस्येमुळे भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. रत्नागिरी शहरासाठी शासनाने मंजूर केलेल्या ६३ कोटी खर्चाच्या सुधारित नळपाणी योजनेचे काम सध्या सुरू आहे. हे काम पूर्ण होण्यास अजून वर्षभराचा कालावधी जाणार आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने पाणी पुरवठ्याला लागलेले ग्रहण सुटणार आहे.यंदा रत्नागिरी शहरातील खासगी विहिरीही एप्रिलअखेर व मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटल्या. रडतखडत सुरू असलेल्या रत्नागिरीच्या नळपाणी योजनेला अत्यल्प पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.मे महिन्यात टॅँकरचेच पाणीशहरवासियांना मे महिन्यात दररोज टॅँकरच्या ५५ फेऱ्यांमार्फत पाणीपुरवठा केला जात होता. त्यामुळे मे महिन्यात रत्नागिरी नगर परिषदेकडून शहरातील १५ प्रभागात नागरिकांना तब्बल साडेसोळाशे फेऱ्यांमार्फत टॅँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. यावेळी पावसाळ्यातही टॅँकरने पाणीपुरवठा सुरू ठेवावा लागणार आहे.मुख्य जलवाहिनीचे काम सुरुरत्नागिरी शहराच्या सुधारित नळपाणी योजनेच्या शीळ ते साळवी स्टॉप येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या उभारणीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. साळवी स्टॉप ते शीळमधील पाटीलवाडीपर्यंत जलवाहिनी उभारणीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापुढील जॅकवेलपर्यंतचे ५०० मीटरमधील जलवाहिनी उभारणीचे काम बाकी आहे.जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर या नवीन जलवाहिनीतून साळवी स्टॉप जलशुध्दीकरण केंद्रामध्ये शीळचे पाणी आणले जाणार आहे. त्यामुळे आता मुख्य जलवाहिनीद्वारे होणारी पाणीगळती पूर्णपणे थांबणार आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईRatnagiriरत्नागिरी