शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

chiplun flood : पूरमुक्तीच्या चळवळीत श्रेयवादाचा लढा, मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे चिपळूणवासीयांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 14:06 IST

चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ डिसेंबर रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

चिपळूण : चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असले, तरी पालकमंत्री, खासदार व स्थानिक आमदारांना निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात श्रेयवाद लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता महसूलमंत्र्याच्या या बैठकीत गाळप्रश्नी ताेडगा निघणार का, हेच पाहायचे आहे.

वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढावा, पूररेषेला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने गेल्या सात दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याप्रश्नी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मागणी केल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे बचाव समितीला पत्रद्वारे कळवले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासात महसूलमंत्री थोरात यांनी १३ डिसेंबर रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुक्याशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु, या लढ्यात सुरुवातीपासून पाठपुरावा करत असलेले आमदार शेखर निकम यांच्यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गाळप्रश्नी काॅंग्रेसने श्रेय घेण्यासाठी ही बैठक बाेलावल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र त्याचवेळी थोरात यांच्या बैठकीकडेही सर्वाचे लक्ष वेधले आहे. या बैठकीतून गाळ उपसा, त्यासाठी लागणार निधी व रॉयल्टीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या आंदोलनाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन पक्षविरहीत लढाई सुरू ठेवण्याचा प्रयत्न बचाव समितीकडून केला जात आहे. मात्र, महसूल मंत्र्यांनी बाेलावलेल्या बैठकीमुळे श्रेयवादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

श्रेयवादापेक्षा प्रश्न सुटणे महत्त्वाचे

चिपळुणातील गाळप्रश्नी सारेच राजकीय नेतेमंडळी एकवटले आहेत. सर्वांकडून प्रयत्न सुरू असतानाच आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी खासदार विनायक राऊत यांनी महसूलमंत्र्यांसमवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर काॅंग्रेसने थेट बैठकच बाेलावल्याने श्रेयवादाची ठिणगी पडली. याप्रश्नी श्रेयवादाची लढाई खेळण्यापेक्षा चिपळूणवासीयांचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे, असा सूर निघत आहे.

चिपळूणच्या गाळप्रश्नी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघाल्यास किंवा निधी उपलब्ध केल्यास आनंदच होणार आहे. प्रयत्न कोणाचेही असोत मात्र हा प्रश्न सुटणे गरजेचा आहे. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात