शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

chiplun flood : पूरमुक्तीच्या चळवळीत श्रेयवादाचा लढा, मंत्रालयातील आजच्या बैठकीकडे चिपळूणवासीयांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 14:06 IST

चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ डिसेंबर रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

चिपळूण : चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनाची दखल घेऊन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंत्रालयात १३ रोजी गाळप्रश्नी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला समितीच्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले असले, तरी पालकमंत्री, खासदार व स्थानिक आमदारांना निमंत्रण नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात श्रेयवाद लढाई सुरु झाल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे आता महसूलमंत्र्याच्या या बैठकीत गाळप्रश्नी ताेडगा निघणार का, हेच पाहायचे आहे.

वाशिष्ठी आणि शिव नदीतील गाळ काढावा, पूररेषेला स्थगिती मिळावी, या मागणीसाठी चिपळूण बचाव समितीने गेल्या सात दिवसापासून साखळी उपोषण सुरू केले आहे. याप्रश्नी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी मागणी केल्यावर महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे बचाव समितीला पत्रद्वारे कळवले होते. मात्र, त्यानंतर अवघ्या २४ तासात महसूलमंत्री थोरात यांनी १३ डिसेंबर रोजी मंत्रालयात स्वतंत्र बैठक आयोजित केली आहे.

या बैठकीला चिपळूण बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील काही काँग्रेस पदाधिकाऱ्यांनाही निमंत्रित केले आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये तालुक्याशी प्रत्यक्ष संबंध नसणाऱ्यांचाही समावेश आहे. परंतु, या लढ्यात सुरुवातीपासून पाठपुरावा करत असलेले आमदार शेखर निकम यांच्यासह खासदार विनायक राऊत, पालकमंत्री अॅड. अनिल परब यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यामुळे गाळप्रश्नी काॅंग्रेसने श्रेय घेण्यासाठी ही बैठक बाेलावल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र त्याचवेळी थोरात यांच्या बैठकीकडेही सर्वाचे लक्ष वेधले आहे. या बैठकीतून गाळ उपसा, त्यासाठी लागणार निधी व रॉयल्टीबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत या आंदोलनाला उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत, भाजपचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद जठार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. विविध पक्षाचे पदाधिकारी एकत्रित येऊन पक्षविरहीत लढाई सुरू ठेवण्याचा प्रयत्न बचाव समितीकडून केला जात आहे. मात्र, महसूल मंत्र्यांनी बाेलावलेल्या बैठकीमुळे श्रेयवादाची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे.

श्रेयवादापेक्षा प्रश्न सुटणे महत्त्वाचे

चिपळुणातील गाळप्रश्नी सारेच राजकीय नेतेमंडळी एकवटले आहेत. सर्वांकडून प्रयत्न सुरू असतानाच आमदार शेखर निकम यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. त्याचवेळी खासदार विनायक राऊत यांनी महसूलमंत्र्यांसमवेत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बैठक घेण्याबाबत पत्र दिले. त्यानंतर काॅंग्रेसने थेट बैठकच बाेलावल्याने श्रेयवादाची ठिणगी पडली. याप्रश्नी श्रेयवादाची लढाई खेळण्यापेक्षा चिपळूणवासीयांचा प्रश्न सुटणे गरजेचे आहे, असा सूर निघत आहे.

चिपळूणच्या गाळप्रश्नी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा निघाल्यास किंवा निधी उपलब्ध केल्यास आनंदच होणार आहे. प्रयत्न कोणाचेही असोत मात्र हा प्रश्न सुटणे गरजेचा आहे. - उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात