शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

होमगार्डस्वर सक्तीच्या सेवामुक्तीची तलवार

By admin | Updated: July 1, 2016 23:40 IST

बारा वर्ष सेवा केलेल्यांना फटका : राजन साळवी यांनी निर्णयावर मागितली गृहराज्यमंत्र्यांकडे स्थगिती

रत्नागिरी : होमगार्ड संघटनेत १२ वर्षे स्वयंसेवक म्हणून नाममात्र मानधनावर अहोरात्र सेवा केलेल्या उमेदवारांना सेवेतून मुक्त करावे, या राज्य शासनाच्या निर्णयाविरोधात आमदार राजन साळवी यांनी नाराजी व्यक्त करत थेट गृहराज्यमंत्री राम शिंंदे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या चर्चेनंतर या शासन निर्णयाला स्थगिती देण्याचे गृहराज्यमंत्री राम शिंंदे यांनी मान्य केल्याने राज्यासह रत्नागिरीतील शेकडो होमगार्डस्ना दिलासा मिळाला आहे.‘निष्काम सेवा’ हे ब्रीद घेऊन मानवसेवी संघटना म्हणून होमगार्डची ओळख सर्वसामान्यांना आहे. गरीब तसेच सर्वसामान्य घटकातील बहुतांश महिला व पुरुष या संघटनेत गेल्या १५ ते २० वर्षांपासून अहोरात्र सेवा बजावत आहेत. केवळ ४०० रुपयांच्या अत्यल्प मानधनावर कायदा -सुव्यवस्थेसाठी प्रामाणिपणे सेवा करणाऱ्या या महिला व पुरुषांना राज्याबाहेरही विविध निवडणुका, कुंभमेळ्यासारख्या ठिकाणीसुध्दा सेवा बजावावी लागते. तसेच सेवेचे मानधन हे तीन ते पाच महिन्यानंतर प्राप्त होणे, पोशाखाचे कापड, त्याची शिलाईदेखील काहीवेळा स्वखर्चातून द्यावी लागणे, कौटुंबिक समस्येमुळे काही अपवादात्मक वेळी बंदोबस्ताला न आल्यास कारवाईलाही सामोरे जावे लागणे अशा एक ना अनेक समस्यांच्या गर्तेत निव्वळ आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे होमगार्ड आपली सेवा बजावत आहेत. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने होमगार्ड संघटनेतील स्वयंसेवकांना पुनर्नियुक्ती देण्याच्या शासन निर्णयांतर्गत १२ वर्षे सेवा झालेल्या होमगार्ड स्वयंसेवकांना सेवेतून मुक्त करण्याचा उफराटा निर्णय घेतल्याने राज्यातील हजारो स्वयंसेवकांवर उपासमारीचे संकट उद्भवले असून, यामुळे बेरोजगारीचेही प्रमाण वाढणार आहे. नवीन शासन निर्णयांतर्गत पुनर्नियुक्तीसाठी प्रारंभीची इयत्ता ७ वी उत्तीर्णची अट बदलून ती आता किमान १० वी उत्तीर्ण करण्यात आली आहे. पुरुष भरतीसाठी १६०० मीटर धावणे व गोळाफेक तर महिला भरतीसाठी ८०० मीटर धावणे अशा जाचक अटीदेखील घालण्यात आल्या आहेत. शासनाच्या या अविचारी निर्णयाचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील होमगार्ड स्वयंसेवकांनादेखील बसला आहे. आज रत्नागिरी जिल्ह्यात ४५० पुरुष व १०० महिला होमगार्ड स्वयंसेवक कार्यरत आहेत. शासनाच्या या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील १०० पुरुष व २० महिला होमगार्डना बसणार असून, उर्वरीत स्वयंसेवकदेखील टप्याटप्याने या सेवेतून बाहेर पडणार आहेत. आपली १५ ते २० वर्षांची सेवा संपुष्टात येऊन आपल्यावर उपासमारीसोबत बेरोजगारीचे संकट येणार या भीतीने धास्तावलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच संघटनेच्या राज्यातील काही प्रतिनिधींनी आमदार राजन साळवी यांची याबाबत रत्नागिरी येथील कार्यालयात भेट घेतली. यावेळी साळवी यांनी संबंधित होमगार्डस स्वयंसेवकांकडून याविषयीची सर्व माहिती घेतली. शासनाच्या या अनावश्यक निर्णयाप्रती नाराजी व्यक्त केली.त्यानंतर आमदार राजन साळवी यांनी तत्काळ गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याशी कार्यालयातून दूरध्वनीवरून संपर्क साधला. यावेळी त्यांनी होमगार्डस्नी मांडलेल्या व्यथा त्यांच्याकडे मांडल्या. यावेळी या होमगार्डस्च्या सेवेचा विचार करता सेवामुक्तीचा घेतलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी राजन साळवी यांनी यावेळी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. (प्रतिनिधी)