शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी

By मेहरून नाकाडे | Updated: April 17, 2023 20:17 IST

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे.

मेहरून नाकाडे

रत्नागिरी : नैसर्गिक बदलामुळे यावर्षी हापूस आंब्याचे उत्पादन खालावले आहे. स्थानिक हापूस बाजारात कमी असताना, पर्यटक, मुंबईकरांकडून हापूसला वाढती मागणी आहे. त्यामुळे काही विक्रेते रत्नागिरी हापूस सांगत चक्क ग्राहकांच्या माथी कर्नाटक हापूस मारत आहेत. ग्राहकांना फसवणूक झाल्याचे ऊशिरा लक्षात येत आहे.

नैसर्गिक मधूर स्वाद व अविट गोडीमुळे हापूसला वाढती मागणी आहे. रत्नागिरीतील हापूस कर्नाटकात लागवड करण्यात आल्याने रत्नागिरी हापूसच्या हंगामातच हा हापूस तयार होऊन बाजारात येतो. रंग, आकार, सुगंध यामुळे ग्राहक गोंधळतात. सध्या रत्नागिरी हापूस ८०० ते १००० रूपये डझन दराने विकण्यात येत आहे. तर कर्नाटक हापूस ५५० ते ६५० रूपये डझन दराने विकला जात आहे. मात्र कर्नाटक हापूस असा न भासविता चक्क रत्नागिरी हापूस सांगत विक्री केली जात आहे. त्यामुळे ग्राहकांना सुरूवातीला दर रत्नागिरी हापूसचे सांगितले जातात. ग्राहक व विक्रेता यांच्यात दरावरून घासघीस सुरू होते. दर कमी करून हापूस पाहिजे तेवढा बाॅक्समध्ये पॅकींग केला जातो. ग्राहकांना दर कमी केल्याचा आनंद वेगळाच असतो. मात्र आपली हापूसमध्ये फसगत झाली असल्याचे आंबा खाल्यानंतरच लक्षात येत आहे.

हापूसची मांडणी अशी केली जाते की रत्नागिरी व कर्नाटक हापूस सहजासहजी ओळखताच येत नाही.रत्नागिरी हापूसची वैशिष्टये१) हा हापूस आकाराने गोलाकार असतो

२) साल पातळ असते३) देठाकडे पिवळसर तर टोकाकडे हिरवट असतो

३) पिकल्यानंतर दोन ते तीन दिवसातच काळे डाग पडू लागतात.कर्नाटक हापूसची वैशिष्टये१) हा हापूस उभट असतो

२) साल जाड असते३) देठाकडे केशरी, लाल रंग तर खाली पिवळसर असतो

४) चार पाच दिवस टिकतोदरात कमालीचा फरक असल्याने ग्राहकांची हापूस नावे फसगत होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबा