शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

स्वाभिमान हा केवळ तिघांचा पक्ष : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 23:28 IST

महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

ठळक मुद्देखंडाळा येथील मेळाव्यात नारायण राणे यांच्यावर टीकास्त्र

गणपतीपुळे : महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा केवळ तिघांचा म्हणजेच राणे कुटुंबीयांचा पक्ष आहे. त्यामध्ये कुणी कार्यकर्तेच नाहीत, अशा शब्दांत खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या टीकेचा समाचार घेतला.

खासदार नारायण राणे यांची काही दिवसांपूर्वी नजीकच्या खंडाळा येथे सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती, त्याच गावात शिवसेनेचा शनिवारी सायंकाळी मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ज्यांनी पैसे घेऊन ‘स्वाभिमान’मध्ये प्रवेश केला असेल, त्यांनी आपले हात पाय, बोटे, मान सांभाळावेत.

कुटुंब पहिले की पैसा याचा विचार करावा. नारायण राणे यांनी एकदा शिवसेनेकडून पराभवाची धूळ चाखलीच आहे, परंतु त्यांची अजूनही हिम्मत असेल, तर त्यांनी विधानसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.कोणत्याही फुट्या-दीडफुट्यांना उत्तर देण्यासाठी ही सभा आयोजित केलेली नाही, तर ही लोकांशी हितगुज करण्यासाठी आयोजित केलेली सभा आहे, असे ते म्हणाले.

सिंधुदुर्गात आतापर्यंत नऊ जणांचा बळी गेला, तो कुणी घेतला? याचा हिशेब चुकता करण्याची आणि जाब विचारण्याची वेळ आली आहे, असेही राऊत यांनी सांगितले. ज्यांची मतदारांनीच सिंधुदुर्गातून हकालपट्टी केली, तो त्याच्या कर्मानेच मरणार, आता राणे यांची सत्ता संपुष्टात येण्याची वेळ आली आहे. विधानसभा निवडणुकीत राणे यांची उरलीसुरली सत्ताही संपुष्टात येईल, असे ते म्हणाले.

या मेळाव्याला आमदार उदय सामंत, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, प्रकाश साळवी, विलास चाळके, उद्योजक भैया सामंत, माजी सभापती प्रकाश रसाळ, बाबू म्हाप, गजानन पाटील, आदी उपस्थित होते.हे काय मला पराभूत करणार?मागील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी रत्नागिरीत आले होते. तरीही भाजप उमेदवार माझा पराभव करू शकला नाही, तेथे ‘हे’ माझे काय करणार? अशा शब्दांत आमदार आणि ‘म्हाडा’चे अध्यक्ष उदय सामंत यांनी नाव न घेता नारायण राणे यांच्यावर हल्ला केला.

टॅग्स :PoliticsराजकारणVinayak Rautविनायक राऊत ElectionनिवडणूकRatnagiriरत्नागिरी