शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती, जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:22 IST

सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयादीमध्ये बदल न करताच बदल्या, सुगम-दुर्गमची यादी चुकीचीसीईओंनी पाठविली होती दुरुस्तीसाठी यादी, १९२ शिक्षकांनी केले होते अपिल

रत्नागिरी : सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सुगम-दुर्गमची यादी करताना मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला होता. या यादीमध्ये दुर्गम भागातील अनेक शाळा सुगम भागात, तर सुगम भागातील शाळा दुर्गम भागात दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या याद्या बदली करण्यासंदर्भात शिक्षण समितीच्या सभेतही ठराव करण्यात आला होता.दरम्यान, सुगम-दुर्गमची चुकीची यादी दुरुस्ती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी शासनाकडे पाठविली होती. ती यादी बाजूला ठेवून शासनाने जिल्ह्यातील ३३४८ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदलीचे आदेश शासनाने काढले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर अनेक वर्षे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमुळे दिलासा मिळाला होता.सुगम - दुर्गम शाळांच्या यादीमध्ये दुरुस्ती न करताच बदल्या करण्यात आल्याने अनेक महिला शिक्षकांना अति दुर्गम भागातील शाळांमध्ये जावे लागले होते. पती-पत्नी असलेल्या शिक्षकांना १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याच्या विरोधात अन्यायग्रस्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

त्यानंतर बदली झालेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. या अपिलाची सुनावणी गुरुवारी आयुक्तांकडे झाली. अपिल केलेल्या शिक्षकांचा बदलीला कोणताही विरोध नव्हता. केवळ त्यांचा चुकीच्या यादीला विरोध होता.सुगम - दुर्गम शाळांची यादी चुकीची करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दुरुस्तीची यादी पाठवूनही शासनाने ती न स्वीकारताच या बदल्या करण्यात आल्याचे शिक्षकांच्या वकिलांनी आयुक्तांसमोर म्हणणे मांडले. त्यानंतर आयुक्तांनी अपिलात गेलेल्या १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या शिक्षकांना आज गुरुवारी कार्यमुक्त करुन दि. ३ मे रोजी शुक्रवारी हजर होण्याचे आदेश सर्व तालुक्यांना दिले होते. त्यानुसार आज बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. बदली झालेल्या शाळांमध्ये अनेक शिक्षक हजरही झाले आहेत. मात्र, १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती दिल्याने त्यांच्या शाळेवर हजर होणाºया शिक्षकांसमोर अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीRatnagiriरत्नागिरी