शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती, जिल्हा परिषद प्रशासनासमोर पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 12:22 IST

सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देयादीमध्ये बदल न करताच बदल्या, सुगम-दुर्गमची यादी चुकीचीसीईओंनी पाठविली होती दुरुस्तीसाठी यादी, १९२ शिक्षकांनी केले होते अपिल

रत्नागिरी : सुगम-दुर्गम भागातील शाळांची यादी चुकीची केलेली असतानाही त्यामध्ये बदल न करताच शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याविरोधात अपिल केलेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांच्या बदल्यांना कोकण विभागीय आयुक्तांनी आज स्थगिती दिली. त्यापूर्वी कार्यमुक्तीचे आदेश दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची सुगम-दुर्गमची यादी करताना मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला होता. या यादीमध्ये दुर्गम भागातील अनेक शाळा सुगम भागात, तर सुगम भागातील शाळा दुर्गम भागात दाखविण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. या याद्या बदली करण्यासंदर्भात शिक्षण समितीच्या सभेतही ठराव करण्यात आला होता.दरम्यान, सुगम-दुर्गमची चुकीची यादी दुरुस्ती करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी शासनाकडे पाठविली होती. ती यादी बाजूला ठेवून शासनाने जिल्ह्यातील ३३४८ शिक्षकांच्या बदल्या केल्या होत्या.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शिक्षकांच्या बदलीचे आदेश शासनाने काढले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. तर अनेक वर्षे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या शिक्षकांना या बदल्यांमुळे दिलासा मिळाला होता.सुगम - दुर्गम शाळांच्या यादीमध्ये दुरुस्ती न करताच बदल्या करण्यात आल्याने अनेक महिला शिक्षकांना अति दुर्गम भागातील शाळांमध्ये जावे लागले होते. पती-पत्नी असलेल्या शिक्षकांना १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील शाळांमध्ये बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे याच्या विरोधात अन्यायग्रस्त शिक्षकांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

त्यानंतर बदली झालेल्या जिल्ह्यातील १९२ शिक्षकांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे अपिल केले होते. या अपिलाची सुनावणी गुरुवारी आयुक्तांकडे झाली. अपिल केलेल्या शिक्षकांचा बदलीला कोणताही विरोध नव्हता. केवळ त्यांचा चुकीच्या यादीला विरोध होता.सुगम - दुर्गम शाळांची यादी चुकीची करण्यात आली होती. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची दुरुस्तीची यादी पाठवूनही शासनाने ती न स्वीकारताच या बदल्या करण्यात आल्याचे शिक्षकांच्या वकिलांनी आयुक्तांसमोर म्हणणे मांडले. त्यानंतर आयुक्तांनी अपिलात गेलेल्या १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती देण्याचे आदेश दिले.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली झालेल्या शिक्षकांना आज गुरुवारी कार्यमुक्त करुन दि. ३ मे रोजी शुक्रवारी हजर होण्याचे आदेश सर्व तालुक्यांना दिले होते. त्यानुसार आज बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. बदली झालेल्या शाळांमध्ये अनेक शिक्षक हजरही झाले आहेत. मात्र, १९२ शिक्षकांच्या बदल्यांना स्थगिती दिल्याने त्यांच्या शाळेवर हजर होणाºया शिक्षकांसमोर अडचण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकTransferबदलीRatnagiriरत्नागिरी