शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचा संशय, एटीएसने रत्नागिरीतून एकाला घेतले ताब्यात

By अरुण आडिवरेकर | Updated: July 27, 2023 17:35 IST

कसून चौकशी सुरु

रत्नागिरी : दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याच्या आरोपावरून कोथरुड पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन अतिरेक्यांना अटक केली आहे. त्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरीतील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे पुढे आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे एटीएसच्या नवी मुंबई युनिटने ही कारवाई केली आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून, या प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे आढळल्यास त्याच्यावर पुढील कारवाई केली जाणार आहे.पुण्यात दुचाकीचोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युसुफ या दोन संशयितांचा दहशतवादी कटात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यांना ५ ऑगस्टपर्यंत एटीएस काेठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, त्यांचा एक साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाला हाेता. हे दोघे १५ महिन्यांपासून पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. या दाेघांची चौकशी केली असता अनेक नावे समोर आली आहेत. दरम्यान, महाराष्ट्र एटीएसने अलीकडेच पुण्यात अटक केलेल्या दोन संशयित दहशतवादी प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासादरम्यान दोघांच्या चौकशीतून आणखी काही लोकांची नावे समोर आली आहेत. त्यानंतर एटीएसच्या पथकाने अनेकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे.या तीनही दहशतवाद्यांनी राजस्थानमधील जयपूर इथे घातपात करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) त्यांचा शोध घेत होती. एनआयएने तिसऱ्या संशयितावर पाच लाखाचे इनामही जाहीर केले आहे. दरम्यान, पुणे पाेलिसांनी ताब्यात घेतलेल्या दाेघांकडून मिळालेल्या माहितीनुसार दहशतवादी कारवाईत रत्नागिरीतील एकाचा समावेश असल्याची माहिती एटीएसला मिळाली आहे. त्यानुसार पाेलिसांनी रत्नागिरीतून एकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चाैकशी सुरू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारीterroristदहशतवादी