शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
4
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
5
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
6
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
7
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
9
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
10
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
11
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
12
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
13
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
14
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
15
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
16
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
17
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
19
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
20
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान

जाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 12:20 IST

wildlife RatnagiriNews- गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.

ठळक मुद्देजाळ्यात अडकलेल्या कासवाला जीवदानगुहागर तालुक्यातील तवसाळ येथील प्रकार

असगोली : गुहागर तालुक्यातील तवसाळ आगर गावात मच्छिमारीसाठी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या कासवाला पाटील कुटुंबियांकडून जीवदान देण्यात आले.तवसाळ आगर येथील अवधूत पाटील आणि त्यांचा पुतण्या विक्रांत पाटील हे बिगर यांत्रिकी होडीतून मासेमारीसाठी गेले होते. पाण्यात टाकलेले जाळे त्यांनी वर घेतले असता त्यात ऑलिव्ह रिडले जातीचे कासव दिसले. कासव अडकल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतःचे किमती जाळे कापून त्या कासवाची जाळ्यातून मुक्तता करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिले.याबाबत अवधूत पाटील यांनी सांगितले की, माशांसाठी टाकलेल्या जाळ्यात कासव अडकण्याचा हा आठवडाभरातील तिसरा प्रकार आहे. कासवांसाठी सध्याचा हा हंगाम अंडी घालण्याचा असल्याने किनाऱ्याकडे येणारे मादी कासव जाळ्यात अडकल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.

तवसाळ समुद्रकिनारी सात ते आठ ठिकाणी कासवांची अंडी मिळाली असल्याने हेही कासव अंडी घालण्यासाठीच आसरा घेत असल्याची शक्यता असून, आम्ही किमती जाळ्यांची पर्वा न करता त्या कासवाला पाण्यातल्या पाण्यातच जाळ्यातून सोडवून पुन्हा समुद्रात सोडून दिल्याचे पाटील यांनी सांगितले.नुकसान भरपाईचा प्रस्तावदुर्मीळ माशांच्या प्रजातींचे रक्षण करताना नुकसान झाल्यास संबंधितांना त्याची नुकसान भरपाई मिळण्याची महाराष्ट्र शासन मत्स्य विभागाची योजना आहे. त्यानुसार अवधूत पाटील यांनी गुहागरचे सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी) यांच्याकडे संपर्क साधला. याबाबत सर्व कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुराव्यांची पडताळणी करुन पाटील यांच्या नुकसान भरपाई संदर्भातील प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरी