शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
4
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
5
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
6
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
8
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
9
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
10
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
11
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
12
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
13
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
14
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
15
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
16
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
17
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
18
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
19
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
20
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 

कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:44 IST

कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन गुहागर येथील व्याडेश्वर मंदिराला भेट

गुहागर : कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणातील तरुणांनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष जात भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य माझ्या कोकणासाठी लागेल ते मी देण्यास तयार आहे, असे अभिवचन देतानाच त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असे सांगितले. निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुध्दा मी येणाऱ्या सरकारच्या काळात सुध्दा कोकणासाठी प्रयन्न निश्चितच करेन, असे सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणच्या विकासासाठी संघटित व्हा, इंदोरमध्ये मी काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा दळणवळण फार कमी होते. आपल्या राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला देशाला जोडायचे असेल तर वाहतुक व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आज इंदोरमध्ये रेल्वे, हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे निर्णय मी दळणवळणाच्या बाबतीत घेतले आणि म्हणूनच आज इंदोर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे त्यांनी सांगितले.कोकणात फळप्रक्रिया प्रकल्प उभाराकोकणच्या शेतकऱ्यांनी सुध्दा एकत्र येऊन फळप्रक्रिया प्रकल्प उभे केले पाहिजेत. आज कोकणचा आंबा हा देशात जातो. फणस, काजू यांसारख्या फळांवर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास मी तयार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी प्रयन्न केले पाहिजेत. एक माहेरवाशीण म्हणून मी नेहमीच तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनRatnagiriरत्नागिरी