शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

कोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 16:44 IST

कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.

ठळक मुद्देकोकणातील शेतकरी आत्महत्या करत नसल्याचा अभिमान : सुमित्रा महाजन गुहागर येथील व्याडेश्वर मंदिराला भेट

गुहागर : कोकणातील माणस ही कष्टकरी आहेत. भले गरिबीत राहत असतील मात्र कोकणातील शेतकरी मात्र कधी आत्महत्या करत नाही. परिस्थितीतून मार्ग काढण्याची ताकद कोकणच्या माणसामध्ये आहे. म्हणून देशाच्या संसदेत काम करताना एक माहेरवाशीण म्हणून मला याचा सार्थ अभिमान आहे, असे उद्गार गुहागरमध्ये श्री व्याडेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेल्या देशाच्या लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काढले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणातील तरुणांनी आता पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. कोकणचा विकास करायचा असेल तर सर्व पक्ष जात भेद बाजूला ठेवून तुम्ही एकत्र या. त्यासाठी देशाच्या पातळीवर जे सहकार्य माझ्या कोकणासाठी लागेल ते मी देण्यास तयार आहे, असे अभिवचन देतानाच त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, असे सांगितले. निवडणुका जवळ आल्या असल्या तरी सुध्दा मी येणाऱ्या सरकारच्या काळात सुध्दा कोकणासाठी प्रयन्न निश्चितच करेन, असे सांगितले.त्या पुढे म्हणाल्या की, कोकणच्या विकासासाठी संघटित व्हा, इंदोरमध्ये मी काम करण्यास सुरूवात केली. तेव्हा दळणवळण फार कमी होते. आपल्या राज्याला, जिल्ह्याला, तालुक्याला देशाला जोडायचे असेल तर वाहतुक व्यवस्था होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. आज इंदोरमध्ये रेल्वे, हवाई वाहतूक मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये सर्वात महत्वाचे निर्णय मी दळणवळणाच्या बाबतीत घेतले आणि म्हणूनच आज इंदोर प्रगतीच्या वाटेवर आहे, असे त्यांनी सांगितले.कोकणात फळप्रक्रिया प्रकल्प उभाराकोकणच्या शेतकऱ्यांनी सुध्दा एकत्र येऊन फळप्रक्रिया प्रकल्प उभे केले पाहिजेत. आज कोकणचा आंबा हा देशात जातो. फणस, काजू यांसारख्या फळांवर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास मी तयार आहे. कोकणातील शेतकऱ्यांनी प्रयन्न केले पाहिजेत. एक माहेरवाशीण म्हणून मी नेहमीच तुमच्याबरोबर राहीन, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.

टॅग्स :Sumitra Mahajanसुमित्रा महाजनRatnagiriरत्नागिरी