शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

भक्तीपोटी मांडवीकरांचा ३६ वर्षे अन्नदानाचा यशस्वी प्रयोग

By admin | Updated: November 14, 2014 00:20 IST

रत्नागिरी : देवाच्या समोरील भक्त एकसमान आहेत.

रत्नागिरी : देवाच्या समोरील भक्त एकसमान आहेत. तेथे श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही. देवाचा महाप्रसाद शिजवतानादेखील ठराविक श्रीमंतांकडून पैसे न घेता घरपट शिधा गोळा केला जाते. गेली ३६ वर्षे ही परंपरा अखंड सुरू असून, दरवर्षी २५०० ते ३००० भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात.श्री कालभैरव जयंती दि. १४ रोजी असून, दरवर्षी श्रीदेव भैरव मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात गेल्या ३६ वर्षांपासून ‘ग्रामशांती यज्ञ महाप्रसादा’चे आयोजन करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी केवळ ठराविक श्रीमंत किंवा दानशुरांकडून देणगी गोळा केली जात नाही. त्यासाठी मांडवी गावातील प्रत्येक घरातून शिधा गोळा करण्यात येते. गावात २५० घरे आहेत. प्रत्येक घरातून यज्ञासाठी २५ रूपये इतकी नाममात्र रक्कम गोळा करण्यात येते, तर महाप्रसादासाठी शिधा जमवण्यात येतो.विशेष म्हणजे मांडवीतील नागरिक यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे सढळ हस्ते मदत करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिधा जमतो. कालभैरव जयंतीदिनी महाप्रसादासाठी भक्तांची एकच गर्दी लोटते.प्रत्येक घरातून तांदूळ, बटाटे, गोडेतेल, कच्चे टोमॅटो, पावटे, तूरडाळ, मसाला, गूळ, नारळ किंवा सुके खोबरे गोळा केले जाते. महाप्रसादाच्या एक दिवस आधी सर्व वस्तूंचे संकलन केले जाते. संकलित केलेल्या शिधामध्ये भात, वरण, टोमॅटो व बटाटा घालून रसभाजी, गूळ खोबऱ्याचे पुरण व लोणचे असे सुग्रास भोजन शिजविण्यात येते. महाप्रसादासाठी मांडवीबरोबर शहर परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. महाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेत जर कमी पडले तर मात्र उत्सव मंडळ अन्य लागणाऱ्या वस्तू विकत आणते. श्रीदेव भैरव मंदिर शांती यज्ञ व महाप्रसाद उत्सव मंडळातर्फे दरवर्षी कालभैरव जयंतीचे औचित्य साधून यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंडळातर्फे महाप्रसादाला येणाऱ्या भाविकांना अगत्याने वाढले जाते. इतकेच नव्हे; तर वाडीतील एखाद्या घरातील व्यक्ती आजारी असेल तर द्रोणातून महाप्रसाद देण्यात येतो.