शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

भक्तीपोटी मांडवीकरांचा ३६ वर्षे अन्नदानाचा यशस्वी प्रयोग

By admin | Updated: November 14, 2014 00:20 IST

रत्नागिरी : देवाच्या समोरील भक्त एकसमान आहेत.

रत्नागिरी : देवाच्या समोरील भक्त एकसमान आहेत. तेथे श्रीमंत गरीब असा भेदभाव केला जात नाही. देवाचा महाप्रसाद शिजवतानादेखील ठराविक श्रीमंतांकडून पैसे न घेता घरपट शिधा गोळा केला जाते. गेली ३६ वर्षे ही परंपरा अखंड सुरू असून, दरवर्षी २५०० ते ३००० भाविक महाप्रसादाचा आस्वाद घेतात.श्री कालभैरव जयंती दि. १४ रोजी असून, दरवर्षी श्रीदेव भैरव मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतो. मंदिरात गेल्या ३६ वर्षांपासून ‘ग्रामशांती यज्ञ महाप्रसादा’चे आयोजन करण्यात येत आहे. परंतु त्यासाठी केवळ ठराविक श्रीमंत किंवा दानशुरांकडून देणगी गोळा केली जात नाही. त्यासाठी मांडवी गावातील प्रत्येक घरातून शिधा गोळा करण्यात येते. गावात २५० घरे आहेत. प्रत्येक घरातून यज्ञासाठी २५ रूपये इतकी नाममात्र रक्कम गोळा करण्यात येते, तर महाप्रसादासाठी शिधा जमवण्यात येतो.विशेष म्हणजे मांडवीतील नागरिक यासाठी आपापल्या ऐपतीप्रमाणे सढळ हस्ते मदत करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिधा जमतो. कालभैरव जयंतीदिनी महाप्रसादासाठी भक्तांची एकच गर्दी लोटते.प्रत्येक घरातून तांदूळ, बटाटे, गोडेतेल, कच्चे टोमॅटो, पावटे, तूरडाळ, मसाला, गूळ, नारळ किंवा सुके खोबरे गोळा केले जाते. महाप्रसादाच्या एक दिवस आधी सर्व वस्तूंचे संकलन केले जाते. संकलित केलेल्या शिधामध्ये भात, वरण, टोमॅटो व बटाटा घालून रसभाजी, गूळ खोबऱ्याचे पुरण व लोणचे असे सुग्रास भोजन शिजविण्यात येते. महाप्रसादासाठी मांडवीबरोबर शहर परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित असतात. महाप्रसादासाठी येणाऱ्या भाविकांचा अंदाज घेत जर कमी पडले तर मात्र उत्सव मंडळ अन्य लागणाऱ्या वस्तू विकत आणते. श्रीदेव भैरव मंदिर शांती यज्ञ व महाप्रसाद उत्सव मंडळातर्फे दरवर्षी कालभैरव जयंतीचे औचित्य साधून यज्ञ व महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मंडळातर्फे महाप्रसादाला येणाऱ्या भाविकांना अगत्याने वाढले जाते. इतकेच नव्हे; तर वाडीतील एखाद्या घरातील व्यक्ती आजारी असेल तर द्रोणातून महाप्रसाद देण्यात येतो.