शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एक दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया, मेंदूशी संबंधित शस्त्रक्रियेने वाचवले बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:37 IST

कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.

ठळक मुद्दे डोक्याच्या मागे आलेली मोठी गाठ काढलीमेंदूशी संबंधित शस्त्रक्रियेने वाचवले बाळ

मनोज मुळयेरत्नागिरी : कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली आहे. जिल्हा रूग्णालयात एक महिला प्रसुत झाली. तिच्या बाळाच्या कवटीच्या मागच्या बाजूला एक भोक होते. एका दिवसात या भोकातून मेंदूचा काही भाग बाहेर आला. त्याच्याभोवती पाण्याचे आवरण होते. वैद्यकीय परिभाषेत त्याला एन्सिफॅलोसिल मेनिंगोसिल म्हणतात.

बाळाची ही स्थिती लक्षात घेता, शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असतो. त्याखेरीज कोणतेही उपाय हे बाळाला त्रास देणारेच ठरतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिलेल्या परवानगीमुळे आणि नैतिक पाठबळामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, असे रूग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी लोकमतला सांगितले.

अशा शस्त्रक्रियांमध्ये ७० टक्के धोका असतो. २० ते ३० टक्केच मुले वाचतात. मात्र, तो एकच पर्याय होता. अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यातील पहिला एक तास त्या गाठीमध्ये जमा झालेले पाणी हळूहळू काढण्यात गेला. मेंदूचे निकामी झालेले भाग बाजूला करणे आणि उपयोगी भाग परत कवटीमध्ये सुरक्षित ठेवणे, यात जास्त काटेकोर काम करावे लागले. बाळाच्या शरीराचे तापमान कायम राहावे, यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान तेथील ए. सी. पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. तब्बल अडीच तासांनी शस्त्रक्रिया संपली. बुधवारी ही शस्त्रक्रिया झाली. आता दोन दिवसांनी बाळ व्यवस्थित आहे.बास.. बाळाने श्वास घ्यावा!ही शस्त्रक्रिया संपल्यानंतर नेमके काय मनात आले, हे सांगताना डॉ. फडके म्हणाले की, एवढंच मनात आले की, भूल उतरेल तेव्हा बाळाने श्वास घ्यावा. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद असतोच. पण रूग्ण नॉर्मल होईपर्यंत हायसे वाटत नाही. इथे तर एक दिवसाच्या बाळावरची शस्त्रक्रिया होती. त्यामुळे त्याने श्वास घ्यावा हेच अपेक्षित होतं.सगळं काही छोटं-छोटंशस्त्रक्रिया बाळाची असल्याने त्याच्यासाठी औषधाचे डोस खूप छोटे करावे लागले. आवश्यक साधने छोटी वापरावी लागली. मोठ्या लोकांना १० ते २० मि.मी.ची सुई वापरली जाते. या बाळासाठी १ मि.मी.ची सुई वापरावी लागली. छोट्या मुलाला जास्त वेळ भूल देता येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया जलदगतीने आणि तरीही नाजूकपणे करणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वाया जाऊ न देणे महत्त्वाचे होते. ताण या गोष्टीचा होता. प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करताना ४० मि.ली. इतकंच रक्त वाया गेल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले.टीमवर्कमुळेच साध्य झालेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिलेला पाठिंबा, भूलतज्ज्ञ डॉ. दांडेकर यांनी केलेले अप्रतिम काम, बालरोगतज्ज्ञांसह सर्वांनीच केलेले टीमवर्क यामुळेच एक दिवसाच्या बाळावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असे ते म्हणाले.

टॅग्स :docterडॉक्टरRatnagiriरत्नागिरी