शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

एक दिवसाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया, मेंदूशी संबंधित शस्त्रक्रियेने वाचवले बाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 16:37 IST

कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.

ठळक मुद्दे डोक्याच्या मागे आलेली मोठी गाठ काढलीमेंदूशी संबंधित शस्त्रक्रियेने वाचवले बाळ

मनोज मुळयेरत्नागिरी : कवटीला असलेल्या भोकामुळे मेंदूचा काही भाग बाहेर आलेला आणि त्याला पाण्याचे आवरण. बाळ फक्त एक दिवसाचं. डोक्याच्या आकारापेक्षा मोठा गोळा डोक्याच्या मागच्या बाजूने तयार झालेला. मुलाला जगवायचं तर तो गोळा काढणे गरजेचे. एक दिवसाचं मूल असल्याने त्यात खूप गुंतागुंत होती. पण डॉ. श्रीविजय फडके यांनी आपल्या वरिष्ठांच्या पाठबळावर आणि एका मोठ्या टीमसह या गुंतागुंतीतून बाळाला सोडवले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् बाळ वाचलं.रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया झाली आहे. जिल्हा रूग्णालयात एक महिला प्रसुत झाली. तिच्या बाळाच्या कवटीच्या मागच्या बाजूला एक भोक होते. एका दिवसात या भोकातून मेंदूचा काही भाग बाहेर आला. त्याच्याभोवती पाण्याचे आवरण होते. वैद्यकीय परिभाषेत त्याला एन्सिफॅलोसिल मेनिंगोसिल म्हणतात.

बाळाची ही स्थिती लक्षात घेता, शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असतो. त्याखेरीज कोणतेही उपाय हे बाळाला त्रास देणारेच ठरतात. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी दिलेल्या परवानगीमुळे आणि नैतिक पाठबळामुळे शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला, असे रूग्णालयाचे न्यूरो सर्जन डॉ. श्रीविजय फडके यांनी लोकमतला सांगितले.

अशा शस्त्रक्रियांमध्ये ७० टक्के धोका असतो. २० ते ३० टक्केच मुले वाचतात. मात्र, तो एकच पर्याय होता. अडीच तास ही शस्त्रक्रिया सुरू होती. त्यातील पहिला एक तास त्या गाठीमध्ये जमा झालेले पाणी हळूहळू काढण्यात गेला. मेंदूचे निकामी झालेले भाग बाजूला करणे आणि उपयोगी भाग परत कवटीमध्ये सुरक्षित ठेवणे, यात जास्त काटेकोर काम करावे लागले. बाळाच्या शरीराचे तापमान कायम राहावे, यासाठी शस्त्रक्रियेदरम्यान तेथील ए. सी. पूर्ण बंद ठेवण्यात आला होता. तब्बल अडीच तासांनी शस्त्रक्रिया संपली. बुधवारी ही शस्त्रक्रिया झाली. आता दोन दिवसांनी बाळ व्यवस्थित आहे.बास.. बाळाने श्वास घ्यावा!ही शस्त्रक्रिया संपल्यानंतर नेमके काय मनात आले, हे सांगताना डॉ. फडके म्हणाले की, एवढंच मनात आले की, भूल उतरेल तेव्हा बाळाने श्वास घ्यावा. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचा आनंद असतोच. पण रूग्ण नॉर्मल होईपर्यंत हायसे वाटत नाही. इथे तर एक दिवसाच्या बाळावरची शस्त्रक्रिया होती. त्यामुळे त्याने श्वास घ्यावा हेच अपेक्षित होतं.सगळं काही छोटं-छोटंशस्त्रक्रिया बाळाची असल्याने त्याच्यासाठी औषधाचे डोस खूप छोटे करावे लागले. आवश्यक साधने छोटी वापरावी लागली. मोठ्या लोकांना १० ते २० मि.मी.ची सुई वापरली जाते. या बाळासाठी १ मि.मी.ची सुई वापरावी लागली. छोट्या मुलाला जास्त वेळ भूल देता येत नाही. त्यामुळे शस्त्रक्रिया जलदगतीने आणि तरीही नाजूकपणे करणे आवश्यक होते. शस्त्रक्रियेदरम्यान रक्त वाया जाऊ न देणे महत्त्वाचे होते. ताण या गोष्टीचा होता. प्रत्यक्षात शस्त्रक्रिया करताना ४० मि.ली. इतकंच रक्त वाया गेल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले.टीमवर्कमुळेच साध्य झालेजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे यांनी दिलेला पाठिंबा, भूलतज्ज्ञ डॉ. दांडेकर यांनी केलेले अप्रतिम काम, बालरोगतज्ज्ञांसह सर्वांनीच केलेले टीमवर्क यामुळेच एक दिवसाच्या बाळावरील ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली, असे ते म्हणाले.

टॅग्स :docterडॉक्टरRatnagiriरत्नागिरी