शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो : उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी

By शोभना कांबळे | Updated: December 11, 2023 16:58 IST

सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा

रत्नागिरी : वाचन ही काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रा. समीर गडबडे, प्रा. डॉ. शंकर जाधव, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा. प्राजक्ता कदम, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, तहसीलदार (सर्वसाधारण) हणमंत म्हेत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले की, पृथ्वीच्या अस्तित्वापासून अनेक सिध्दांत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उकलही झालेली नाही. आज सहजपणे मिळालेल्या गोष्टींसाठी पूर्वी खूप झगडायला लागले आहे, संघर्ष करावा लागला आहे. जनावरांनाही हक्क आहे, इथपर्यंत प्रगल्भता वाढलेली आहे. २५ वर्षापुढील जग कसे असेल यावर लिहितो, वाचतो. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो. या सर्वांचा पाया पुस्तक आहे. वाचन संस्कृती आणि भाषा वृध्दींगत करण्याचे काम करा, असेही ते म्हणाले.

प्रा. कदम म्हणाल्या की, वेस बदलली की, भाषा बदलते. भाषेत भिन्नता असली तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यामधून विविध भाषांची गोडी लावता येईल. भाषा शिकणं, हा उत्सव होऊ शकतो. शिक्षण जरी मातृभाषेत असले, तरी इतर भाषांचा सन्मान हा करायला हवा, असे त्या म्हणाल्या.जिल्हा नियोजन अधिकारी मुळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी राेहिणी रजपूत यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला. माधव अंकलगे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केले. तसेच तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी प्रास्तविक केले. यावेळी छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रंथपाल, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी