शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाचनाने आपण घडतो, अन् समाज घडवू शकतो : उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी

By शोभना कांबळे | Updated: December 11, 2023 16:58 IST

सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा

रत्नागिरी : वाचन ही काळाची गरज आहे. वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने बरोबर आहे. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो, असे मत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे सुब्रम्हनीय भारती यांचा जन्मदिवस ‘भारतीय भाषा दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पुरवठा अधिकारी रोहिणी रजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे, प्रा. समीर गडबडे, प्रा. डॉ. शंकर जाधव, प्रा. महेंद्र शिंदे, प्रा. प्राजक्ता कदम, कोमसापचे केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, तहसीलदार (सर्वसाधारण) हणमंत म्हेत्रे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी दीपक झोडगे उपस्थित होते.निवासी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी म्हणाले की, पृथ्वीच्या अस्तित्वापासून अनेक सिध्दांत आहेत. त्याचबरोबर अनेक प्रश्नांची उकलही झालेली नाही. आज सहजपणे मिळालेल्या गोष्टींसाठी पूर्वी खूप झगडायला लागले आहे, संघर्ष करावा लागला आहे. जनावरांनाही हक्क आहे, इथपर्यंत प्रगल्भता वाढलेली आहे. २५ वर्षापुढील जग कसे असेल यावर लिहितो, वाचतो. वाचनाने आपण घडतो आणि समाज घडवू शकतो. या सर्वांचा पाया पुस्तक आहे. वाचन संस्कृती आणि भाषा वृध्दींगत करण्याचे काम करा, असेही ते म्हणाले.

प्रा. कदम म्हणाल्या की, वेस बदलली की, भाषा बदलते. भाषेत भिन्नता असली तरी भारतीय संस्कृती एक आहे. नाटक, संगीत, साहित्य यामधून विविध भाषांची गोडी लावता येईल. भाषा शिकणं, हा उत्सव होऊ शकतो. शिक्षण जरी मातृभाषेत असले, तरी इतर भाषांचा सन्मान हा करायला हवा, असे त्या म्हणाल्या.जिल्हा नियोजन अधिकारी मुळे आणि जिल्हा पुरवठा अधिकारी राेहिणी रजपूत यांनी मनोगत व्यक्त करुन कार्यक्रमाचा समारोप केला. माधव अंकलगे यांनी कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन केले. तसेच तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी प्रास्तविक केले. यावेळी छोटेखानी ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. कार्यक्रमाला ग्रंथपाल, विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी