चिपळूण : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भौगोलिक परिस्थितीचा विचार करता उपनगर विभाग शहरामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा ठराव मंजूर झाला असून, त्यासाठी जागेचे भूसंपादन होण्यास विलंब होत असल्याने संबंधित भागाचे तातडीने भूसंपादन व्हावे, अशी मागणी आता जोर धरु लागली आहे. लवकरच काही उपनगरे आता शहरात समाविष्ट होणार आहेत.सन १९७७मध्ये उपनगर विभागातील बहादूरशेख, मार्कंडी, शंकरवाडी, काविळतळी, रावतळे ही गावे शहरात समाविष्ट करण्याबाबतचा ठराव नगर परिषद प्रशासनातर्फे मंजूर झाला आहे. संबंधित विभागाचे भूसंपादन होण्यासाठी २७ लाख ९२ हजारच्या आर्थिक खर्चासही मंजुरी देण्यात आली आहे. यासंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून या क्षेत्राची मोजणी करावी म्हणून नगर भूमापन अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. मात्र, अद्याप या क्षेत्राची मोजणी झालेली नाही. या विभागात अंदाजे ४ हजार ५०० प्रॉपर्टीधारक असून भूसंपादन झाल्यास आवश्यक त्या ठिकाणी रस्ता व अन्य सुविधा देणे शक्य होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांची मागणी फळाला येणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया जलद गतीने व्हावी, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)धरणाचा वक्र दरवाजा व आपत्कालीन दरवाजा यांच्यातील काँक्रीटचा काही भाग ढासळला.आपत्कालीन दरवाजे योग्य पद्धतीने काम करीत नसल्याने पेच.वक्र दरवाजे व आपत्कालीन दरवाजे यांच्यामधील काँक्रीटचे अंदाजपत्रक तयार.धरणाचे मजबुतीकरण होणे गरजेचे.
उपनगरी प्रभागांचे भूसंपादन रखडले
By admin | Updated: August 26, 2015 23:18 IST