शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:18 IST

दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते

ठळक मुद्देनववीच्या निकालाकडे केले लक्ष केंद्रीत, अंमलबजावणीचे आदेश

रत्नागिरी : दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते किंवा अभ्यासात मागे पडणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्यात येते. शिक्षण विभागाने नववीच्या निकालाकडे लक्ष केंद्रीत करून नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना केली आहे.

आतापर्यंत  नववीच्या निकालाची माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे माहिती घेतली जाणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण ठरविले होते, या धोरणात बदल केलेला नाही. त्यामुळे अभ्यासात कमी प्रगती असणाºया विद्यार्थ्यांवर नववीत गेल्यानंतर नापास होण्याचा कठीण प्रसंग ओढवतो..

अभ्यासात फारशी प्रगती नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याकडे शाळाचा कल अधिक असतो.  इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा व शाळा निकालाबाबत सर्वाेच्च शिखरावर असावी, याकरिता इयत्ता नववीमध्ये अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना नापास केले जाते. अनेक शाळांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात असतेच असते. आठवीपर्यंत पास व निकाल नाही. नापास होणाºया विद्यार्थ्यांना शाळा बदलण्याची सूचना केली जाते अथवा त्यांचा १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसविण्यात येत असते.

गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश वर्षभरापूर्वीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून शाळांना बजावण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शाळांकडून गांभीर्याने अंमलबजावणी न करता ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कामकाज सुरू आहे. नापास विद्यार्थ्यांच्या  फेरपरीक्षा घेण्याबाबत शाळांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून, सूचनांची अंमलबजावणी शाळांनी प्राधान्याने करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण