शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नववीच्या नापास विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा--: शिक्षण विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2019 11:18 IST

दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते

ठळक मुद्देनववीच्या निकालाकडे केले लक्ष केंद्रीत, अंमलबजावणीचे आदेश

रत्नागिरी : दहावीचा शंभर टक्के निकाल लावण्याच्या उद्देशाने केवळ चांगली प्रगती असणाºया विद्यार्थ्यांनाच  परीक्षेला बसवण्यात शाळा प्रयत्नशील असतात. नापास होणाºया विद्यार्थ्यांना १७ नंबरचा अर्ज भरून परीक्षेला बसविले जाते किंवा अभ्यासात मागे पडणाºया विद्यार्थ्यांना नापास करण्यात येते. शिक्षण विभागाने नववीच्या निकालाकडे लक्ष केंद्रीत करून नापास विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याची सूचना केली आहे.

आतापर्यंत  नववीच्या निकालाची माहिती शिक्षण विभागाकडून घेण्यात येत नव्हती. मात्र, यापुढे माहिती घेतली जाणार आहे. शासनाने विद्यार्थ्यांना इयत्ता आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण ठरविले होते, या धोरणात बदल केलेला नाही. त्यामुळे अभ्यासात कमी प्रगती असणाºया विद्यार्थ्यांवर नववीत गेल्यानंतर नापास होण्याचा कठीण प्रसंग ओढवतो..

अभ्यासात फारशी प्रगती नसलेल्या विद्यार्थ्यांना अनुत्तीर्ण करण्याकडे शाळाचा कल अधिक असतो.  इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागावा व शाळा निकालाबाबत सर्वाेच्च शिखरावर असावी, याकरिता इयत्ता नववीमध्ये अभ्यासात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना नापास केले जाते. अनेक शाळांमध्ये नापास विद्यार्थ्यांची संख्या कमी जास्त प्रमाणात असतेच असते. आठवीपर्यंत पास व निकाल नाही. नापास होणाºया विद्यार्थ्यांना शाळा बदलण्याची सूचना केली जाते अथवा त्यांचा १७ नंबरचा फॉर्म भरून परीक्षेला बसविण्यात येत असते.

गतवर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नववीच्या वर्गात नापास झालेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश वर्षभरापूर्वीच शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांकडून शाळांना बजावण्यात आले होते. मात्र, या आदेशाची शाळांकडून गांभीर्याने अंमलबजावणी न करता ‘येरे माझ्या मागल्या’प्रमाणे कामकाज सुरू आहे. नापास विद्यार्थ्यांच्या  फेरपरीक्षा घेण्याबाबत शाळांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून, सूचनांची अंमलबजावणी शाळांनी प्राधान्याने करणे आवश्यक आहे.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण